ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. यांनतर राज्यभरात शिवसैनिक जल्लोष करताना दिसत आहेत. तर न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी(dasara melava) कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतू आपल्या या परंपरेला गालबोट लागता काम नये, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. माझ्या बहिणी व भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये, असे ठाकरे म्हणाले. (Shiv sena uddhav thackeray shivaji park dasara melava mumbai high court)
न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उत्साहामध्ये या, वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असे कृत्य करू नका’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याबाबत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेला परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देण्यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबात शिवसेनेच्या वकिलांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘आम्ही असे कोणतेच कृत्य करणार नाही’, असे आश्वासन न्यायालयाला दिले.
हे ही वाचा : भगवा झेंडा हाच आपला उमेदवार; उद्धव ठाकरेंचा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ६६ सालापासून विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो. या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबतच्या केसमध्ये शिवसेनेला विजय मिळाला आहे. आमचा न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच, “न्यायदेवेतेने आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, त्याबाबत शिवसैनिकांना मी आवाहन करतो की, त्यांनी उत्साहामध्ये या, वाजत-गाजत या, शिस्तीने या कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला गाळबोट लागेल असे कृत्य करू नका”, असेही त्यांनी म्हटले.
“आमची शिवसेना वाढलेली आहे. परवा आमचा मुंबईतील शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होता, त्यावेळी बरेचजण तिथे उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्य सरकारवर टाकलेली आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारसुद्धा याला जबाबदार राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांचे योग्य काम करेल”, असे उद्धव ठाकरे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सांगितले.