गेल्या काही काळापासून बहुचर्चित असेलेल्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि वंचित बहूजन आघाडीच्या (VBA) युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thakre ) यांच्या जयंतीचे औत्सुक्य साधून शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहूजन आघाडीचे अध्य़क्ष प्रकाश ठाकरे (Prakash Ambedkar) यांनी यांनी आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हि एक ऐतिहासिक घटना आहे. आज एका स्वप्नाची पूर्ती झाली असून महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. ठाकरे आणि आंबेडकर या नावाला इतिहास आहे. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे आजोबा या दोघांनीही समाजातील वाईट प्रवृत्तीवर आघात केले. आज देखिल देशात आणि राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या असून त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार एकत्र आलो आहोत.
भाजपची बाहेरख्यालीपणा
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जम्मू-काश्मिरात पीडीपी पक्षासोबत युती भाजपने केली. आरएसएस संपवण्याची भाषा बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केली होती, त्याच नितीश कुमारांसोबत भाजपने युती केली. म्हणजे भाजपने बाहेरख्यालीपणा केला तरी चालते…आणि आम्ही वटपौर्णिमा जरी साजरी केली, तरी यांचा आक्षेप, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला केला.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी शिवशक्ती आण् भीमशक्ती एकत्र येण्याची गरज आहे. सध्या देशामध्ये भांडवल शाही आणि हुकुमशाहीचे राजकारण सुरू आहे. इडीच्या माध्यमातून राजकिय नेतृत्व संपवण्याचा आणि विरोधी पक्ष संपवण्याचा घाट भाजपचा आहे. नरेंद्र मोदींनी स्वताच्याही पक्षातील नेतृत्व संपवले. एकदिवस त्यांच्याही नेतृत्वाचा अंत होईल. असेही ते म्हणाले. राज्यातील महत्वाचे मुद्दे मागे पडले आहेत त्यावर आम्ही दोघं एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे हिंदुत्व मान्य- प्रकाश आंबेडकर
शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या हिंदुत्वाची मांडणी केली ती आम्हाला मान्य असून मांडणी शिवसेनेची आहे. प्रबोधनकारांनी समाज व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची मांडणी केली. तसेच सर्व समाजाला एकत्र आणणारे त्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदुत्वावर चालणारा पक्ष आहे.” असेही ते म्हणाले.