प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूरात शहरात घडलेल्या प्राकाराबाबत मी स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याशी फोनवर बोललो होतो. परिस्थिती शांत करण्यास किंवा लोकांना शांततेसाठी आवाहन करायला मी तयार आहे. मात्र कदाचित त्यांना माझी गरज वाटली नसावी, अशा शब्दात श्रीमंत शाहू छत्रपती यांनी खंत व्यक्त केली. कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणानंतर घडलेला घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.
महाराज म्हणाले, सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे. आपल्या लोकशाहीला 75 वार्षे पुर्ण झाली. आता आपण 21 व्या शतकात राहतोय, अशावेळी आपल्या पुर्वजांचा विचार व शिकवण आपल्या डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. यापुर्वी कोल्हापूरात असे प्रकार कधी घडले नव्हते. आता या घटनेच्या मुळापर्यंत जाणे गरेजेचे आहे. याचे कारण शोधून याकडे माणसशास्त्र पद्धतीने पाहिले पाहीजे, असे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची व गृहविभागाची आहे. त्यांनी या संबंधिचे सर्व आहवाल घेतले पाहिजे. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे का? याचा तपास केला पाहिजे. पोलिसांनी यापुढे सतर्क राहिले पाहिजे. तपास यंत्रणा कार्यान्वयीत करणे गरजेचे आहे. कालचे प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर झाले पाहिजे. व दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे सांगितले.
एका व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे
कोल्हापूरातील घटना ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अपयश म्हणावे लागेल का? या प्रश्नावर शाहू छत्रपती म्हणाले, या प्रकरणात एकाच व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. सत्ताधारी व विरोधकांनी मर्यादा ठेवाव्यात. अशा दंगलींमुळे लोकांचे हाल होतात, याचे भान दोघांना असायला हवे.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणतात….
– सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा.
– 21 व्या शतकात राहतोय याचे भान सर्वांनी ठेवावे.
– पूर्वजांचे विचार, शिकवण ध्यानात ठेवा.
– घटनेच्या मुळापर्यंत पोहचून मानसशास्त्राrय अभ्यास आवश्यक.
– छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथील घटनांची लिंक आहे का? ते तपासा.
-फास्टट्रॅकवर सुनावणी करून दोषींना शिक्षा द्या.