पालकमंत्री उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samnt) यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे (janata darbar) आयोजन शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देतानाच सांगितले की नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये त्यांचे प्रश्न आधीच सोडवण्यात यावेत. जर कोणी अधिकारी पूर्वग्रह दूषित ठेवून एखाद्या नागरिकाचे काम अडवून ठेवणार असेल तर त्याच्यासाठी माझ्यासारखा वाईट कोणी नसेल.
जनता दरबाराला जिल्ह्याभरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सकाळी १० वाजल्यापासूनच टोकन घेण्यासाठी नागरिक हजर होते. अल्पबचत सभागृहाच्या बाहेर सभामंडप उभारून नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जनता दरबारात सुमारे अडीचशे अर्ज दाखल झाले होते.
जनता दरबारासाठी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांसह विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.