- धोकादायक वळण, उतरण असतानाही 50 वेगाचा फलक
- म्हणून पुढे उतरणीवर वाहनाचा वेग वाढून होतात अपघात
- सध्या रस्ता रूंदीकरणचे काम युद्धपातळीवर
- ग्रामस्थ तसेच सरपंचांच्या प्रयत्नाना आले यश
प्रतिनिधी / फेंड़ा
राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबवते. यात वाहतूक पोलींसासह विविध सामाजिक संस्थाना सहभागी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतरही रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नाही अपघातमागचे मूळ कारण शोधणेच हाच खरा संशोधनाचा विषय ठरत आहे. फोंडा-पणजी महामार्गावरील मानसवाडा-कुंडई हे जंक्शनही अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. याबाबत काही अंत्यत सुक्ष्म वाटणाऱ्या बाबी लक्षात घेतल्यास अपघातांना कारणीभूत ठरत आहे ते धोकादायक वळण, उतरण आणि त्याहून धोकादायक बाब म्हणजे उतरणीवर लावण्यात आलेला तब्बल 50 वेगमर्यादा दर्शविणारा सूचनाफलक आहे, त्यामुळे गोव्याबाहेरुन येणाऱ्या वाहनांना अपघात होतात, असे दिसून आले आहे.
फोंडयाहून पणजीच्या दिशेने जात असताना वाहनचालक मानसवाडा कुंडई येथील उतरणीवर वेगमर्यादा 50 फलकावर कटाक्षाने नजर टाकत मार्गक्रमण करीत असतात. गोव्याबाहेरुन येणाऱ्या वाहनचालकांना पुढच्या रस्त्याची कल्पना नसते. त्यातच त्यांना जर 50 वेगमर्यादेचा सूचनाफलक दिसला तर ते त्या वेगाने जातात. पण पुढे उतरण उतसल्याची त्यांना कल्पना नसते. त्यातच उतरण असल्याने वेग 50 पेक्षा अधिक वाढत जातो. गोव्याबाहेरुन येणाऱ्या कल्पना नसणाऱ्या वाहने एकप्रकारे चकव्यात सापडल्यासारखे होते. परिणामी चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो आणि ही अवजड वाहने सरळ उतरणीवरून खाली कोसळून मोठे आपघात होतात. अशा या मोठ्या अपघातांमध्ये रस्त्dयाच्या कडेला असलेली दुकाने, दुचाकी, चारचाकी वाहने, गाडेवाले सोपे टार्गेट बनत असतात. त्यामुळे दुकानदारांनही कायम धाकधुकीच्या वातावरणात सतर्क राहावे लागते. रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या दुचाकी, बसस्थानकांन यापुर्वी वाहनाच्या धडकेत नासाडी झालेली आहे. मागील दहा वर्षात सुमारे डझनभर वाहने येथे उलटण्याच्या घटना ताज्या असल्याची माहिती येथील दुकानदारांनी दिली. कित्येक जणांना जीव गमवावे लागलेले असून दुकानदारांनाही आर्थिक फटका अनेकवेळा बसलेला आहे.
23 मे पासून रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे तात्पुरते समाधान
अपघानानंतर घटनास्थळावर ठाण मांडून असलेल्या संतप्त कुंडईवासियांनी सद्यााचा मार्ग हा सर्व्हीस रोड म्हणून ठेवावा. तसेच पेट्रोलपंपजवळून काढण्यात आलेला बायपास रोड दुतर्फा अवजड वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी केली आहे. सन 2020 पासून वारंवार या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहे. अनेकजण जीव जात असताना सरकार दरबारी कोणताच तोडगा काढण्यात येत नसल्याची खंत सरपंच सर्वेश गावडे यांनी व्यक्त करीत महामार्ग 48 तास वाहतूकीसाठी पुर्णत: बंद ठेवून निषेध करण्यात आला होता. त्याचे फलित दिसू लागले आहे. कालपासून बायपास मार्गाचे रूदीकरण करून समांतर उपाययोजना करण्यात येत असल्याने सरपंच सर्वेश जल्मी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ब्लॅक स्पॉट ओळखून उपाययोजना करा-तुळशीदास परवार
अतिवेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे यांसह वाहतूक नियम मोडल्यास वाहन चालक आणि सहकाऱ्यांना जीव गमवावा लागल्याचे अनेक अपघातात घडत आहे. मात्र प्र्रत्येक अपघाताच हीच कारणे असतात असे नाही. धोकादायक वळणावर ख•s, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे असे अनेक घटक रस्ते अपघाताच कारणीभूत ठरत आहे. ते ब्लॅक स्पॉट शोधून काढणे व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत रोज कदंबा बसने प्रवास करणाऱ्या तुळशीदास परवार यांनी सांगितले.
मागील दहा वर्षात जंक्शनवर अनेक अपघाताच्या घटना
15 फेब्रु. 2023 रोजी मासळीवाहू कंटेनरने नाक्यावरील दुकानात घुसून तिथे गिऱ्हाईक म्हणून उभार असलेल्या युवकाचा डिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यावेळीही ग्रामस्थ आक्रमक बनले होते. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक बनून लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालून निषेध करणार असल्याचा सुर आळवाला होता.
सद्याचा मार्ग सर्व्हीस रोड करून प्रवासी बस वाहतुक सुरू ठेवावी
सद्या मानसवाडा कुंडई जंक्शनवर सुमारे 10 हून अधिक छोटे दुकानवाले, गाडेधारक आपल्या पोटापाण्dयाचा छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. मासनवाडा, कुंडई पंचायत, पुरसाभाट, गुरवसवाडा, दासोळवाडा, धारजोवाडा, वाडीवाडा, मावजोवाडा या सर्व वाड्यावरील लोक फोंडा व पणजी गाठण्यासाठी या जंक्शनवर थांबत असतात. त्यामुळे सद्याचा मार्ग सर्व्हीस रोड म्हणून ठेवत प्रवासी बस वाहतूकही याच रस्त्यावरून सुरू ठेवावी. अन्यथा दुकानातील मालाला विक्री होणार नाही अशीही चिंता त्यांना सतावत आहे. मागील 30 वर्षापासून छोटा गाड्यावर व्यवसया करीत असलेल्या एका गाडेवाल्dयाने वारंवार होणाऱ्या अपघातसत्रामुळे गाड्यावर फिरकणेच सोडून दिलेले आहे. अशी परिस्थिती इतरावर ओढवू नये म्हणून फक्त औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने बायपास रस्त्यावरून सोडण्यात यावी. सदर मार्ग सर्व्हीस रोड म्हणून दुचाकी, चारचाकी व प्रवासी बससाठी ठेवण्यात यावा. तसेच वाहनाची वेगमर्यादाही उतरणीवर कमी करण्याचे सुचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.