तरुणभारत ऑनलाइन
देशाच्या समृद्धतेमध्ये वन्यजीवांचे अतिशय महत्व आहे.वन्यजीव रक्षकांकडून वन्यजीवांचे रक्षण देखील केले जाते.कोल्हापुरातदेखील अशाचप्रकारे एनिमल रेस्क्यु फोर्स टीम ने एका खारुताईला जीवदान दिल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सर्किट हाऊस येथे एक खारूताई चे पिल्लू अत्यावस्थ अवस्थेत पडले होते.ही बाब एनिमल रेस्क्यु फोर्स टीम च्या निदर्शनास येताच टीमचे संस्थापक अध्यक्ष विक्रम काटकर यांनी त्या खारुताईच्या पिल्लावर योग्य तो उपचार करून पिल्लाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. बऱ्याचवेळेला याच रेस्क्यु टिमच्या नेतृत्वाखाली कित्येक वन्यजीवांना जीवदान दिले गेलं आहे.