रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील नेहमीच गजबजलेल्या शिवाजीनगर येथे 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन गाड्या एकमेकावर आदळल्या. साळवी स्टॉप येथून मारुती मंदिर कडे येणारी एक कार प्रथम एका ओमनी वर आदळली. यानंतर या ओमनीने पुन्हा एका कारला धडक दिली. या अपघातात ओमनी आणि कार या दोन गाड्या डिव्हायडर वर जाऊन आदळल्या. यात तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते.