वार्ताहर /हरमल
येथील किनारी भागांत भटक्मया कुत्र्यांचा धुमाकूळ मोठय़ा प्रमाणात होत असल्याने पर्यटक व निसर्गप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या पर्यटन हंगामास आरंभ झाला असल्याने किनारी भागांत पर्यटकाची वर्दळ वाढू लागली आहे. कित्येक विदेशी पर्यटक भटक्मया कुत्र्यांचे संगोपन करून त्यांची बडदास्त खास जागेत करून घेतली आहे. कधीकाळी त्यांना बाहेर काढल्यास त्यांची हिंसक बनण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कित्येकांना चावा घेण्याचे प्रकार घडले आहेत, असे नागरिक शामसुंदर हरमलकर यांनी सांगितले.
सध्या पर्यटक लहान मुलांना घेऊन किनाऱयावर फिरण्यासाठी उतरत असतात. लहान मंडळी वाळूत किल्ले व पाण्यात मौजमजा करीत असतात, अश्यावेळी कुत्र्यांनी त्यांना चावा घेतल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिक हेमंत मांदे कर यांनी व्यक्त केला.
कुत्र्यांसाठी लसीकरण योजना राबवावी
किनारी भागांत फिरणाऱया भटक्मया कुत्र्यांना रेबीज लसीकरण मोहीम हाती घ्यावी तसेच भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यटक हेंसी (रशिया) यांनी केली आहे.