गुवाहाटी / वृत्तसंस्था
भारताला लक्ष्य करणाऱया दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी आसाम भेटीवेळी दिला. सीमेपलीकडील दहशतवादी नेत्यांना कडक संदेश देताना त्यांनी दहशतवादाचा कठोरपणे सामना केला जाईल, असेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सध्या बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबली असून बांगलादेश हे मित्रराष्ट्र असल्याने पूर्वेकडील सीमेवर शांतता आणि स्थिरता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत सीमेपलीकडून देशाला लक्ष्य करणाऱया दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. यावेळी भारत-चीन संघर्षाच्या काळात मी माझ्या सैन्याचे शौर्य आणि पराक्रम पाहिला. जगाची कितीही मोठी शक्ती असली तरी भारताची मान खाली झुकणार नाही यावर माझा विश्वास पक्का झाला आहे, असे संरक्षणमंत्री 1971 च्या युद्धातील वीरांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात म्हणाले.
सरकार देशातून दहशतवाद संपवण्यासाठी काम करत आहे. दहशतवादाचा कठोरपणे सामना केला जाईल, असा संदेश देण्यात भारत आधीच यशस्वी झाला आहे. देशाला बाहेरून लक्ष्य केल्यास आम्ही सीमा ओलांडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले. भारत पश्चिम सीमेवर जो तणाव अनुभवत आहे तो पूर्व सीमेवर नाही. बांगलादेश हा मित्र देश असल्याने पूर्वेकडील सीमेवर शांतता नांदते. अलीकडेच आसाममधील 23 जिह्यांमधून आफ्स्पा पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मणिपूर आणि नागालँडमधील 15 पोलीस ठाण्यांमधूनही हा कायदा हटवण्यात आला आहे. प्रदेशात आलेल्या शांतता आणि स्थिरतेमुळेच हे शक्मय झाले आहे. यामध्ये ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असेही त्यांनी गौरवाने सांगितले.