न्यू किसान भाजी मार्केट व एपीएमसी भाजी मार्केटचा वाद अद्यापही सुरूच : वाद सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एपीएमसी व्यापार्यांची भेट घेण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
न्यू किसान भाजी मार्केट व एपीएमसी भाजी मार्केटचा वाद अद्याप सुरूच आहे. तो सोडविण्यासाठी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी एपीएमसी व्यापार्यांची भेट घ्यावी यासाठी एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केट समोर धरणे धरले आहे.
पूर्वीचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. पण नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अद्याप त्याकडे लक्ष घातले नाही. त्यांनी येथे येऊन आपल्या अडचणी जाणून घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी धरणे धरले आहे.