बाबुराव देसाई यांचे शिबिरात मार्गदर्शन : खानापूर शिवस्मारक येथे अतिक्रमित शेतकरी संघटनेची बैठक : शेतकऱयांनी गाफील न राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / खानापूर
गेली 18 वर्षे संघटित शेतकऱयांच्या माध्यमातून दिलेल्या लढय़ाला यश आले आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, संघर्ष यामुळे सरकारने शेतकऱयांच्या बाजूने विधेयक मंजूर करून शेतकऱयांना न्याय दिला आहे. हे यश शेतकऱयांच्या संघटित प्रयत्नांचे आहे. मात्र जोपर्यंत उताऱयावर शेतकऱयांचे नाव दाखल होत नाही तोपर्यंत शेतकऱयांनी गाफील न राहता आपली कागदपत्रे पूर्ण करून शासनाने दिलेल्या मुदतीत कागदपत्रे पूर्ण करून आपले नाव दाखल करून घ्यावे, असे ंआवाहन अतिक्रमित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव देसाई यांनी मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
ते म्हणाले, अतिक्रमण केलेल्या जमिनीत जेंव्हा वनखात्याने शेतकऱयांना पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले. त्या वेळेला तालुक्यातील शेतकऱयांना संघटित करून हा लढा उभारला. यावेळी सातत्याने तालुक्यातील शेतकऱयांतून जागृती करून शेतकऱयांना वनखात्याच्या दबावाला बळी पडू दिले नाही. अन्यथा आज 5 हजार एकर जमीन शेतकऱयांकडून गेली असती व शेतकरी भूमिहिन झाले असते. केंद्राने व राज्याने शेतकऱयांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱयांनी आता कागदपत्रांची पूर्तता करावी यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. यासाठी संघटनेकडून शेतकऱयांना कायम मार्गदर्शन करण्यात येईल.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, अतिक्रमण करून उदरनिर्वाह करत असलेल्या शेतकऱयांना त्यांच्या नावाचा उतारा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱयांच्या पाठिशी खंबीरपणे राहू, तसेच शासनाकडून जी काही मदत लागेल ती मिळवून देऊ, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू.
वननिगमचे संचालक सुरेश देसाई म्हणाले, अतिक्रमित जमिनीच्या नोंद पत्रकात तीस ते चाळीस एकर जमीन एकाच शेतकऱयाच्या नावे दाखवून वनखाते दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही जमीन 20 ते 25 शेतकरी मिळून कसत आहेत. सरकारच्या आदेशानुसार या जमिनीचा पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावेळी कसत असलेल्या शेतकऱयांनी आपल्या कागदपत्रांसह आपली जमीन सर्वेक्षण अधिकाऱयांच्या निर्दशनास आणून द्यावी, त्यानंतर स्थानिक वनसंरक्षण समिती, वनविभाग तसेच महसूल खाते यांच्या संयुक्त कागदपत्रांचा आधार घेऊन जमीन शेतकऱयास देण्यात येणार आहे. तरी शेतकऱयांनी अजिबात हलगर्जीपणा करता कामा नये, यावेळी भाजप अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, दुर्गम जंगल भागातील शेतकरी भूमिहीन राहणार नाही, यासाठी सातत्याने तुमच्याबरोबर राहू.
यावेळी बाळाराम सावंत, गुंडू तोपिनकट्टी, बसवराज सानिकोप, अशोक देसाई, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, मष्णू पाटील, संजय पाटील, अमोल बेळगावकर, प्रकाश निलजकर, दिलीप सोनटक्के, राजू रायका उपस्थित होते.