प्रतिनिधी/ सातारा
डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीत श्वास घेऊन 135 कोटी जनतेच्या कल्याणाचे संविधान लिहिले. ते शाळेत गेले नसते तर हे घडले नसते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस देशभर उत्सवासारखा साजरा करावा, असे आवाहन प्राच्यविद्यापंडीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठय़ा उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, आर. के. गायकवाड, शिक्षणाधिकारी एस. जी. मुजावर, मुख्याध्यपक सन्मति देशमाने व विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. आ. ह. साळुखे म्हाणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा एक प्रेणास्त्राsत असून भारतीय समाजाने आणि संबध विद्यार्थी वर्गाने त्यांपासून प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहीजे. पत्रकार अरुण जावळे हे गेली 16 -17 वर्षे या दिवसाचे महत्व विषद करत आहेत, त्यामुळे हा विद्यार्थी देशपातळीवर लवकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी दिवसाला अमूल्य महत्व-खा. श्रीनिवास पाटील
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मला जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न मी करेन असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. एवढय़ा चांगल्या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आले यांचा प्रचंड आनंद होत असल्याचेही ते म्हणाले. या विद्यार्थी दिवसाला खूप वेगळे आणि अमूल्य असे महत्व आहे, ते आपण जपले पाहिजे, अशी भावनाही खासदार पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व विषद केले. धम्मज्योती गजभिये यांनी शाळेच्या विकासासाठी बार्टी सदैव तत्पर राहील असे सांगितले. विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी विद्यार्थी दिवस देशभर होण्यासाठी राबवत असलेल्या पत्रमोहिमेचा उल्लेख करत लवकरच केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना निघणार असल्याचे स्पष्ट केले. सन्मति देशमाने यांनी प्रास्तविक केले.
दरम्यान, सकाळी दहा वाजता अरुण पोळ यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिकदलाचे संचलन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये व अरुण जावळे यांच्या हस्ते पुष्हार अर्पण करून संचलनास प्रारंभ झाला. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे मानवंदना झाली. एक वही एक पेन या अभियानालाही उदंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास पार्थ पोळके, युवराज भांडवलकर, अमर गायकवाड, प्रविण धस्के, विजयराव गायकवाड, विलासराव कांबळे, पी. डी. साबळे, आदी मान्यवरांसह शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकारी तसेच महाराष्ट्राच्या नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी अशा भागातून असंख्य आंबेडकर अनुयायी उपस्थित राहिले होते.