ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री वैशाली टक्करने (Vaishali Takkar) इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वैशाली टक्कर ही मूळची मध्यप्रदेशातील असून, ती वर्षभरापासून इंदौरमध्ये राहत होती. ती एका व्यापारी कुटुंबातीलआहे. 2015 मध्ये तिला स्टार प्लस वाहिनीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी दिली. या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’, ‘विष और अमृत’ आणि ‘बिग बॉस’मध्ये दिसली. ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज ही वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवॉर्डमधील नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.