मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची जनतेसाठी ईश्वराकडे प्रार्थना ; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दै.‘तरुण भारत’ला खास मुलाखत
पणजी : सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय: … मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेसाठी ईश्वराकडे ही प्रार्थना केलीय. आमचा गोवा व गोव्यातील जनता सुखी व्हावी, त्यांचे आरोग्य देखील चांगले असावे यासाठीच आपले सरकार रांत्रदिन राबत आहे. राज्यातील जनतेने दिलेला कौल आणि मिळालेले स्पष्ट बहुमत यामुळेच अनेक विकास प्रकल्प आणि विकास योजना वर्षभरात आपण राबवू शकलो, असे डॉ. सावंत म्हणाले. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यास उद्या एकवर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दै. ‘तऊण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जनतेचे कल्याण हाच आमचा उद्देश, हिच आमची ध्येयासक्ती. त्यासाठीच आम्ही सर्वजण दिवसरात्र राबत आहोत. मोपा विमानतळ प्रकल्प चालीस लागावा, झुवारी नदीवर समांतर पुलाचा एक भाग कार्यान्वित करणे, देशातील एक भव्य आयुर्वेदिक महाविद्यालय गोव्यात स्थापन होऊन ते कार्यान्वित होणे या अशा काही महत्त्वाच्या बाबी प्रत्यक्षात साकार करण्यात आपल्या सरकारला यश आलेले आहे. या अगोदर तीन वर्षे राज्य चालविल्यानंतर स्वयंपूर्ण योजनेचा आढावा घेतला असता गोव्यातील हजारो व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला, त्याचबरोबर हजार जणांना रोजगारही प्राप्त झाला, यातच सरकारचे यश आहे.
स्वयंपूर्ण योजना यशस्वी
जनतेमध्ये स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत आम्ही जागृती केली ती यशस्वी ठरली. दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर देखील ही योजना अधिक वेगाने पुढे नेली. गोव्याची स्वयंपूर्ण योजना एवढी यशस्वी झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या योजनेचे अनुकरण करा, असा सल्ला इतरांना दिला. गोव्याने बनविलेली स्वयंपूर्ण योजना संपूर्ण देशासाठी आदर्श ठरली हेच आमचे यश आहे. या यशासाठी आमचे सर्व सहकारी, मंत्री, आमदार, सरकारी कर्मचारी, अधिकारी, एवढेच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील सदर योजनेचे लाभ गावागावांमध्ये जाऊन जनतेला पटवून दिले. आज देशातील अनेक सरकारांचे प्रमुख नेते व अधिकारी गोव्यात येतात व अभ्यास कऊन आपल्या राज्यात देखील ही योजना राबवितात. स्वयंपूर्ण योजनेद्वारे गोव्यात कोणीही व्यक्ती बेकार राहता कामा नये, तसेच गोव्यातील पारंपरिक शेती, बगायती, गोव्यातील पारंपरिक व्यवसाय यशस्वी व्हावेत यासाठी आम्ही जो प्रयत्न केला त्याचे आता चांगले निकाल हाती येऊ लागलेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आर्थिक क्षेत्रात भिवपाची गरज ना!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्हाला केंद्राकडून येणारा जीएसटी कर बदल्यात नुकसान भरपाई आता कमी होऊ लागलीय. एप्रिलपासून तर ही नुकसान भरपाई पूर्णत: बंद होईल. गोव्याला विविध विकासकामांसाठी ऊ. 3500 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी मिळालेली असताना देखील गोव्याने केवळ 1200 ऊपयांचे कर्ज घेतले. कुठेही निधी कमी पडणार नाही, या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आमच्या यशाचे गमक हे आमच्या बदललेल्या कामाच्या पद्धतीत आहे. तसेच जनतेने दिलेले पूर्ण बहुमत, ज्यामुळे निर्णय घेण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झाले आहे.
गोमंतकीय जनता सुखी व्हावी
गोव्याच्या जनतेला आरोग्य प्राप्त व्हावे, गोमंतकीय जनता सुखी व्हावी हाच आमचा उद्देश आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक तूट येत होती त्याच्या मुळाशी गेलो आणि सर्व दारे बंद कऊन टाकली. परिणामी आमच्याकडे केवळ 1200 हॉटेलांची एवढ्या वर्षात नोंद झाली होती आता यंदा ती 6 हजारच्यावर पोहोचली. हा चमत्कार नाही तर ही वस्तुस्थिती आहे.
पर्यावरणदृष्ट्या गोव्याचा सांभाळ व्हावा
पर्यावरणदृष्ट्या गोव्याचा सांभाळ व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या सरकारने महत्त्वाची पावले उचलली. गोव्याचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट ठेवले व त्या दिशेने आमची पावले पडत आहेत. वर्षभरात अनेक प्रकल्प हाती घेतले. कित्येक प्रकल्पांची पायाभरणी केली. जनतेची मिळालेली साथ हेच आमचे उर्जास्रोत असे मानून आम्हाला गोव्याला देशातील अग्रेसर आणि विकसित राज्य म्हणून पुढे न्यायचे आहे. त्याच दिशेने आम्ही विविध योजना राबवितो. स्वच्छतेसाठी जनतेची साथ अजून मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव कचरा विरहित असावा हे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. जनतेचा कौल शिरोधार्ह मानून जनतेने दिलेली साथ भक्कम होती त्याच आधारावर आम्ही विकासाची चार पावले पुढे टाकू शकलो, असे मुख्dयामंत्री म्हणाले व त्यांनी जनतेचे पुन्हा एकदा आभार मानले.