6 हजार 416 निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक, 287 संवेदनशील मतदान केंद्रे
कारवार : जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 435 मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे. 287 मतदान केंद्राची नोंद संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6 हजार 416 निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानावेळी कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी 2 हजार 59 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 18 तुकड्यांचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. एनएसएस व एनसीसी कॅडेटससह होमगार्ड निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हातभार लावणार आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 11 लाख 94 हजार 714 आहे. यापैकी पुऊष मतदारांची संख्या 5 लाख 99 हजार 527, महिला मतदारांची संख्या 5 लाख 95 हजार 180 इतकी आणि इतर मतदारांची संख्या 7 इतकी आहे. हे मतदार 57 उमेदवारांचे भविष्य निश्चित करणार आहेत. यामध्ये 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 57 उमेदवारांमध्ये हल्याळ, कुमठा, भटकळ आणि यल्लापूर मतदारसंघातील प्रत्येकी 9 उमेदवारांचा समावेश आहे. कारवार मतदारसंघात 11 आणि शिरसी मतदारसंघात 10 उमेदवार नशिब अजमावीत आहेत. कारवार मतदारसंघातील मतदान केंद्राची संख्या 262 आहे. यापैकी ग्रामीण प्रदेशातील मतदान केंद्राची संख्या 196 इतकी तर नगर प्रदेशातील मतदान केंद्राची संख्या 66 इतकी आहे. दरम्यान मंगळवारी निवडणूक कर्मचारी ईव्हीइम आणि अन्य मतदान साहित्यांसह मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सुविधांची चोख व्यवस्था केली आहे. मतमोजणी 13 मे रोजी कुमठा येथील डॉ. ए. व्ही. बाळीगा महाविद्यालयात होणार आहे.
मतदानावर पावसाचे सावट
जिल्ह्यातील विविध ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. हल्याळ येथील मस्टरिंग केंद्रावर पावसामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या काही बसेस ऊतून बसल्या होत्या, असे सांगण्यात आले. मतदानावेळी वऊणराजाचा अडथळा तर निर्माण होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.