गोधोळी ग्रामस्थांचे खानापूर ता. पं. अधिकाऱ्यांना निवेदन : त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
खानापूर : खानापूर तालुक्मयातील गोधोळी ग्राम पंचायतीत मनरेगा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गोधोळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तालुका पंचायतीचे अधिकारी, खानापूरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी बेळगाव तसेच जिल्हा परिषदेचे चीफ सेव्रेटरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल उपस्थित होते. यावेळी गोधोळी ग्राम पंचायतीच्या मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच पंचायतीच्या इतर निधीतही गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. गोधोळी गावातील राम तळ्याच्या कामासाठी मनरेगा व रोजगार हमी योजनेतून दहा लाख ऊपये मंजूर झालेला फंड ग्राम पंचायतीला आलेला असतानासुद्धा व्यवस्थित काम करत असलेल्या ऑपरेटरला बाजूला करून पीडीओ, इंजिनियर व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निधीबाबत दिशाभूल करत आहेत. रोजगार हमी योजनेत कामावर आलेल्या मजुरांना त्यांची कामाची मजुरी देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. तसेच दिवस कमी करून मजुरी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
तसेच बाळगुंद येथील शेतकऱ्याला मनरेगा योजनेतून शेततळे निर्माण करण्यासाठी 5 लाखाचा खर्च दाखविलेला आहे, मनरेगा योजनेतून शेततळे निर्माण करण्यासाठी 98 हजार ऊपयेपेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. परंतु ग्रामपंचायतीचे पीडीओ, इंजिनीयर व ग्रामपंचायत मेंबर यांनी संगनमताने कामाला न आलेल्या लोकांच्या खात्यावर जास्तीचे चार लाख ऊपये दाखविले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. बाळगुंद, गवळीवाडा या ठिकाणी आदिवासी व मंगेमारी लोकांची वस्ती आहे. ती जागा त्या वस्तीतील लोकांच्या नावे ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद नाहीत. याचा गैरफायदा घेऊन तेथील ग्रां. पं सदस्य, पीडीओ, वसुली क्लार्क या तिघांनी मिळून प्रत्येक नागरिकाकडून दहा हजार, बारा हजार, पंधरा हजार, अशी मनाला येईल तशी रक्कम घेऊन ग्रामपंचायतची मिटींग न बोलावता पंचायतीत ठराव पास न करता चुकीच्या पद्धतीने नावे नोंद करून नागरिकांची व पंचायतीची फसवणूक केली आहे. तसेच सदर जागेवर त्या वस्तीतील लोकांची नावे नोंद करायची असेल तर तालुका पंचायतीचे पीडिओ, तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सी. एस. यांची परवानगी घ्यावी लागते. परंतु त्यांची परवानगी नसतानाच सदर लोकांची नावे गैरमार्गाने ग्रामपंचायतीत नोंद केली आहेत. त्यामुळे याची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. येत्या पंधरा दिवसात जर संबंधितावर कारवाई केली गेली नसल्यास गोधोळी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.