वृत्तसंस्था/ रायपूर
येथे झालेल्या इंडिया छत्तीसगड आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत कनि÷ गटातील माजी टॉप सीडेड महिला बॅडमिंटनपटू तस्नीम मिर आणि थॉमस चषक स्पर्धेतील विजेता प्रियांशू राजावत यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीतील अजिंक्मयपदे मिळविली.
महिला एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तस्नीम मिरने सहाव्या मानांकित सामिया फारुकीचा 14-21, 21-17, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्मयपद पटकावले. तर पुरुष एकेरीच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रियांशू राजावतने अनुभवी शुभांकर डे याचा 21-13, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत विजेतेपद मिळविले. मिश्र दुहेरीचे अजिंक्मयपद एन. सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर यांनी पटकाविले. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर या भारतीय जोडीने थायलंडच्या एम. रॅचपोल आणि के. चासिनी यांचा 22-20, 23-21 असा पराभव केला. भारताची तृतीय मानांकित जोडी इशान भटनागर आणि के. साई प्रतिक यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविताना कृष्णा प्रसाद आणि विष्णूवर्धन गौड यांचा 17-21, 21-15, 23-21 असा पराभव केला. महिलांच्या दुहेरीचे जेतेपद जपानच्या होशी आणि ताकाशी यांनी पटकावताना भारताच्या आरती सारा सुनील आणि पूजा दंडू यांचा 12-21, 21-12, 21-7 असा पराभव केला.