ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील वाहतूक कोंडीसंदर्भात अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा ताफाही नुकताच या ठिकाणी अडकला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानंतर चांदणी चौकातील हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी येथील पूल पाडण्याचे काम 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीत बदल केले जातील. पौड मुळशीहुन पुण्यात येणारी वाहतूक मोठया प्रमाणात आहे. या चौकातील पूल पाडल्यावर त्याला पर्यायी रस्ता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पूल पाडल्यानंतर महामार्गवरील दोन लेन वाढणार आहेत. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होणार आहे.
अधिक वाचा : शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार; संदिपान भुमरेंचा गौप्यस्फोट
ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागाकडून एकत्र येत काम केले जाणार आहे. ही जबाबदारी राज्य सरकारची असून, यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.