उत्तर प्रदेशातील आग्रा शहरानजीक राहणारे ग्रामस्थ ऋषभ गुप्ता यांना दुबईमध्ये बँकेत नोकरी होती. कोरोना सुरू होण्यापूर्वी ते आपल्या गावी आले होते. पण नंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने आणि विमानसेवा बंद झाल्याने त्यांना दुबईला परत जाता आले नाही. परिणामी त्यांची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर भावांनीही त्यांना वाऱयावर सोडले. अपमानीत जिणे नको, म्हणून त्यांनी घर सोडून नव्या रोजगाराच्या शोधार्थ भटकंती सुरू केली. बँकेत नोकरी करत असताना काही पैसे गाठीशी बांधले होते. त्या पैशांच्या जोरावर ते चरितार्थ चालवित होते.
कोरोना काळात दूरचा प्रवास करणेही शक्मय नव्हते. त्यामुळे आसपासच्या परिसरातच रोजगाराचा शोध त्यांना घ्यावा लागत होता. अखेरीस एका खासगी संस्थेतून त्यांनी शेती करण्याचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कोरोना काळातील निर्बंध थोडे शिथिल झाल्यानंतरच त्यांना हा अभ्यासक्रम करता आला.
नंतर त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेतीव्यवसाय सुरू केला. आता आपल्या जमिनीमध्ये त्यांनी मोठे पॉलिहाऊस सुरू केलेले असून तेथे विविध प्रकारच्या भाज्या उत्पादन करण्याचा व्यवसाय सुरू केला. दीड वर्षात या व्यवसायात त्यांनी मोठी प्रगती केली असून काकडी व इतर भाजीपाल्याचे उत्पादन सुरू केले आहे. पहिल्याच वषी त्यांना 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळून त्यांचे बरेचसे कर्ज फिटले आहे. येत्या तीन वर्षात कर्जमुक्त होऊन हाच व्यवसाय वाढविण्याचे त्यांचे ध्येय आहे. आपल्या अवघड परिस्थितीत भावांनी आपल्याला सोडले, पण काकडीने तारले, असे ते म्हणतात. त्यांनी आता काकडीच्या बियाण्याचे उत्पादन आणि विक्रीही सुरू केली आहे. येत्या पाच वर्षात या व्यवसायातून आपण वर्षाला 50 लाख रुपयांची कमाई करू शकू, असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात. त्यांच्या या कार्याची दखल राज्य सरकारनेही घेतली असून त्यांनी भविष्यकाळात बेरोजगार तरुणांना शेतीचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र सुरू करण्याचे ध्येय बाळगले आहे.