शिवतिर्थ दारुविक्री मुक्त करण्याचा शिवभक्तांचा निर्धार
प्रतिनिधी/ गोडोली
राजधानी साताऱयातील छत्रपतीच्या पुतळ्यासमोर अवघ्या 40 मीटर अंतरावर असलेला अवंति बार आता अतिक्रमण आणि नियमांचे उल्लंघनामुळे वादाच्या भोव्रयात अडकला आहे. नगरपालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा वाढविलेला पसारा आता आवरायला लागणार आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियमाचा भंग केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या निकालावर या बारचे परवानाचे भवितव्य ठरणार आहे.
पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यासमोर अवंती बारने अतिक्रमण करत पक्के शेड उभारून राजरोसपणे धंदा सुरू आहे. छत्रपती पुतळ्यासमोर असल्याचे शिवप्रेमींना चांगलेच खटकते. पोष्टाच्या इमारतीचा आडोशाचा पुरेपूर गैरफायदा घेत रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवला जातो. तर त्या मालकाने नियमांचे उल्लंघनामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती घेतली असता स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला असून त्याच्या निकालावरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
अवंति बार मालकाने अतिक्रमण मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्याविरोधात नगर पालिकाकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माने यांनी सांगितलं. तर अतिक्रमणाबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवालाने अवंतिला पसारा आवरावा लागणार का याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.
छत्रपतींच्या पुतळ्यासमोर 40 मिटर अवंती बार आणि बाजूला 50 मिटरच्या आत असलेले रजातांद्री वाईन शॉप कायमस्वरूपी बंद करून शिवतिर्थ परिसर दारू विक्री मुक्त करणार असल्याचे कट्टर शिवभक्त निरंजन जाधव, हर्षवर्धन साबळे यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितलं.