मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केल्यानंतर, ‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय राज्य विधानसभाच घेऊ शकते. तसेच सर्वोच्च न्यायालय (SC) याचा निकाल देताना महाराष्ट्र विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवेल अशी प्रतिक्रिया राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना विदानसभा अध्यक्ष म्हणाले, “राज्य सरकारला कोणताही धोका नाही त्यामुळे सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या कोणत्याही विधानाला अर्थ नाही. महारास्ट्र राज्याच्या विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवून सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देईल, अशी मला आशा आहे. शेवटी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच घेतला जाऊ शकतो.” असे नार्वेकर यांनी सांगितले.
२९ नोव्हेंबर रोजी, सुप्रिम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार असून त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या 15 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेचा समावेश आहे.