राजस्थानच्या बाडमेर जिह्यात भारतीय हवाई दलाच्या दोन पायलटनी आपले मिग 21 हे विमान पेट घेतल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यातून उडी मारण्याऐवजी समोरचे अडीच हजार लोकवस्तीचे गाव वाचवण्यासाठी त्यातच बसून ते सुरक्षित स्थळी एका शेतात कोसळू दिले. आपला जीव जाणार आहे हे माहीत असतानाही अडीच हजार लोक वाचवण्यासाठी त्यांनी क्षणार्धात हौतात्म्याचा निर्णय घेतला! भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात ही घटना सुवर्ण अक्षरानेच लिहिली जाईल. त्याचवेळी मिग 21 विमानांच्या अपघातांची मालिका आजही थांबलेली नाही याचे दुःखही व्यक्त केले जाईल. पण, आपण अजून किती हुतात्मे देणार आहोत याचे उत्तर संरक्षण दलाने देशाला देण्याची गरज आहे. विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बाल हे या दुर्घटनेत शहीद झाले. त्यांच्याबद्दल देशभर हळहळ व्यक्त होईल. पण मृत्यूला सामोरे जाण्याचे हे धाडस त्यांनी ज्या एका निर्णायक क्षणी दाखवले ती देशनि÷ा केवळ कौतुक करण्याची बाब नाही. सैनिक हा बलिदान देण्यासाठीच जन्माला आला आहे, असा चुकीचा विचार करण्याची मानसिकता देशातील अनेकांची आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या सीमेवर घडलेल्या विविध घटनांनी सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले तरी त्याबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. गेले अनेक वर्षे अपघाताचे घातचक्र सुरू आहे. आतापर्यंत मिग 21 विमानांच्या 400 पेक्षा जास्त दुर्घटनांमध्ये जवळपास 200 सैनिकांचा बळी गेला आहे. गेल्या एक वर्षात चारवेळा दुर्घटना घडली आहे. नवीन लढाऊ विमाने लष्कराला सोपवण्यास उशीर होत असल्यामुळे चीता, चेतक आणि मिग ही लढाऊ विमाने सैन्याला वापरावी लागत आहेत असे लष्कराकडून सांगितले जाते. अर्थात या लढाऊ विमानांनी भारताचे प्रदीर्घकाळ संरक्षण केलेले आहे. त्यांच्या बाबतीत देश हळवा आहे. प्रत्येक संकटावेळी भारतीय वायुदलाने विजयाचे पारडे भारताच्या बाजूने झुकवण्यासाठी शिकस्त केली आहे. त्या यशाच्या जोरावरच भारतीय सैन्याचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. जगातील 60 देशांनी या प्रचंड वेगवान विमानांचा वापर केलेला आहे. पण भारत अद्यापही हे तंत्रज्ञान वापरत आहे. जनक रशियन तंत्रज्ञान 1985 सालापर्यंत सुरू होते आणि नंतर भारतीय बनावटीच्या सुधारित प्रत्येकी 18 विमानांचे सहा ताफे भारताने आजही वापरात ठेवलेले आहेत. बालाकोट कारवाईदरम्यान भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन यांनी याच विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 या विमानाचा वेध घेतला होता. रशियन तंत्रज्ञानाच्या या विमानाने अमेरिकेकडून मिळालेल्या अत्याधुनिक विमानाला धूळ चारली हे पाकिस्तानने आज देखील मान्य केलेले नाही. 1971 आणि 1999 च्या कारगिल युद्धात या विमानाने अद्वितीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे त्याबाबतीत शंका उपस्थित करणे नेहमीच अवघड जाते. पण हेही वास्तव आहे की, इतक्मया यशस्वी विमानाचे अपघात वारंवार होत असतात. राफेल येईल त्यावेळी येईल. पण मिग सारख्या विमानाच्या अपघातांची मालिका थांबवणे शक्मय आहे. त्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांनी वेळोवेळी भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास दाखवत मिग 21 चे आधुनिकीकरण घडवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने मिग 23, 27 आणि 29 अशा विमानांची निर्मिती करण्यात आली. मिग 29 या विमानांची उड्डाण क्षमता भारतीय हवाई दलाच्या देखभाल दुरुस्ती विभागाने दुप्पट केली आहे. त्याचबरोबर अनेक नव्या बाबीही समाविष्ट केलेल्या आहेत. मात्र हे काम सर्वच विमानांच्या बाबतीत करणे, विशेषतः मिग 21 या विमानांमध्ये बदल आणि आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. भारत सरकारने याबाबतीत देशाला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. भारतीय लष्कराकडे आपल्या अद्वितीय सेवेसाठी देश नेहमीच गौरवाने पाहतो. एका बाजूला हळूहळू आणि दुसऱया बाजूला रोष निर्माण होतो. तो अपेक्षित आहे. भारत सरकारला काय करणार आहोत हे जाहीर करावे लागेल. लोकांचा विश्वास निर्माण करावा लागेल. दोन जवानांनी हौतात्म्य पत्करले, तिथे जर अडीच हजार लोक वस्तीवर हे विमान कोसळले असते तर किती मोठी दुर्घटना घडली असेल याचा विचार सरकारने करण्याची आवश्यकता आहे. पक्षभेद विसरून याबाबतीत एक सकारात्मक भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी घेण्याची गरज आहे. विमानाचे कोसळणे हे केवळ दुःखद आहे असे नव्हे तर त्यातून समाजाला होणाऱया वेदनाही समजून घेतल्या पाहिजेत. याबाबतीत होणारी टीका सरकारने सुद्धा सकारात्मक दृष्टीने घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ आश्वासनावर भर न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहिजे. लष्करी शिस्तीमुळे अनेक तथ्ये समाजासमोर येत नाहीत. मात्र संरक्षण दलांची असलेली मागणी आणि सरकारकडून होत असणारा पुरवठा यांचा विचार केला तर ते प्रमाण व्यस्त आहे हे सहज दिसून येते. लष्करी खर्चाबाबत देशाला काही मर्यादा आहेत हे मान्य केले तरीही अशा बाबतीत तडजोड करता येणार नाही. संसदेचे अधिवेशन सुरू आहे. सरकारला देशाला उद्देशून याबाबतीत आपले म्हणणे मांडण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्यांनी ती जनतेसमोर मांडली पाहिजे. संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांची त्याबाबतीतील भूमिका समजून घेतली पाहिजे आणि तेवढी आर्थिक तरतूद ही केली पाहिजे. जनतेच्या दबावापोटी अमेरिका जगातील अनेक देशातून आपले सैन्य माघारी घेते. भारतीय जनतेने असा दबाव सरकारवर कधीही आणलेला नाही. काँग्रेस काळात मिग बाबत एक मोठे आंदोलन झाले होते. देशाच्या राष्ट्रपतींनी त्यातून सफर करून विश्वास दिला होता. आता तशी सफर करण्याची वेळ निघून गेली आहे. त्याऐवजी काही ठाम कृती घडेल तर येथून पुढे असे हौतात्म्य जवानांना पत्करावे लागणार नाही.
Previous Articleप्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट
Next Article संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.