प्रतिनिधी/ नागठाणे
कारखान्यांनी काटामारीतून शेतकयांचे कोटय़ावधी रूपये लुटले आहेत. ही लुट थांबविण्यासाठी पेट्रोलियम कंपन्याप्रमाणे ऑनलाईन वजनकाटा साखर कारखान्यांनी बसविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. आले व्यापायांनी पहिल्याप्रमाणेच आल्याची एकत्रित खरेदी करावी, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एक रकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी जागर सभेचे अयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, ऍड विजयराव चव्हाण, ऍड सतीश कदम, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगलीत आम्ही एफआरपीपेक्षा जास्त घेतो आणि तुमच्या जिह्यात एफआरपी कपात केली जात असेल तर शेतकयांनी संघटीत होणे गरजेचे आहे. संघटीत झाल्यानेच तुम्हाला रेल्वेकडून 1800 कोटी रूपये मिळाले आहेत. काटामारीतून होत असलेल्या साखर चोरीमुळे 225 कोटीचा जीएसटी बुडवला जात असल्याचे संबधित विभागाला निदर्शनास आणु दिले आहे. काटामारी शेतकयांच्या मुळावर आली असून ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आले खरेदी करताना व्यापारी नवे-जूने करत आहे. ही पद्धत शेतकयांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकडय़ात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीसी आहे असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जालिंदर पाटील, राजू शेळके, अनिल पवार, मनोहर साळुंखे आदीची भाषणे झाली. कार्यक्रमात विक्रम साळुंखे यांनी संघटनेस 11 हजार रूपये तसेच इतर शेतकयांनी यशाशक्ती देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे, दादा कांबळे यांनी केले तर संतोष साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे आदीनी परिश्रम घेतले.