डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर : नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
पाटील गल्ली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहने चालविणे मुश्कील बनले होते. या रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. याची दखल घेऊन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. फोर्ट रोड ते अंबाभवनपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.
पाटील गल्ली रस्ता रुंदीकरणानंतर विविध वाहिन्या घालण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर खोदाई करण्यात आली होती. तसेच काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने रस्ता खराब झाला होता. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून रस्त्यावर ख•s निर्माण झाले होते. त्यामुळे फोर्ट रोड ते अंबाभवन पर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला होता. वाहनधारकांना ये-जा करणे कठीण बनले होते. या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. खानापूर रोड ते जुन्या धारवाड रोडला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे कायम वर्दळ असते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती.
रुंदीकरणानंतर केवळ पॅचवर्क करण्यात आले होते. त्यामुळे रस्ता खूपच खराब झाला होता. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या विकासाचे भाग्य उघडले आहे. जुना धारवाड रोड ते अंबाभवनपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी शनि मंदिरसमोरील ख• बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.