नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानात बदल दिसून येऊ लागले आहेत. ऑक्टोबर महिना सरत असताना तापमानात झपाटय़ाने घट होत असून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये येत्या आठ-दहा दिवसात हिवाळा सुरू होणार आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये 6 ते 7 नोव्हेंबर दरम्यान तापमानात झपाटय़ाने घट होण्याची शक्मयता आहे. देशात एकाचवेळी सक्रिय असलेल्या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बऱयाच राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 11 ते 17 अंशांचा फरक अपेक्षित आहे.
उत्तर आणि पश्चिमेकडून मध्य भारताकडे कोरडे वायव्य वारे वाहत आहेत. उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फवृष्टी झाल्यानंतर हे वारे बर्फाच्छादित भागातून जातील आणि थंडीने मध्य भारतात पोहोचतील. या कारणांमुळे 7 नोव्हेंबरपासून देशात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेपासून मध्य भारतात दिवसाही थंडी जाणवेल. पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स 31 ऑक्टोबरला काश्मीरला धडकेल. त्यामुळे हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये 1 किंवा 2 नोव्हेंबर रोजी हलक्मया हिमवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर दुसरा वेस्टर्न डिस्टर्बन्स 3 नोव्हेंबरला आल्यानंतर काश्मीर ते हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये 5 ते 6 नोव्हेंबरपर्यंत बर्फवृष्टी अपेक्षित आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशात 1 नोव्हेंबरपासून हवामान निरभ्र होईल. मात्र सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी थोडीशी थंडी जाणवेल. मात्र दुपारचे तापमान 30 ते 35 अंशांच्या दरम्यान राहील. दुसरीकडे, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण उत्तर-पूर्व राज्यांमध्ये हवामान कोरडे राहील. पुढील आठवडाभरात या राज्यांतील तापमानात हळूहळू घट होईल.
दिवसा हवामान स्वच्छ राहणार
पुढील आठवडय़ापासून गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत निरभ्र आकाश जाणवेल, परंतु दुपारचे तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मध्य भारतापर्यंतच्या भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी धुके दिसू शकते. अगदी मोकळय़ा ठिकाणीही हलके धुके पडू शकते. दुसरीकडे, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण उत्तर-पूर्व राज्यांमध्ये हवामान कोरडे राहील.
गतवेळच्या तुलनेत थंडीचे दिवस जास्त
यंदा थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. हा सलग तिसरा हिवाळा असेल जेव्हा ला निनाची परिस्थिती कायम राहील. त्याचा परिणाम बंगालच्या उपसागरातही दिसून येईल. नुकत्याच पार पडलेल्या सीतारंग या चक्रीवादळाप्रमाणे पुढील दोन ते तीन महिन्यांत अनेक वादळे निर्माण होण्याची शक्मयता आहे. 2019 हे शतकातील दुसरे सर्वात थंड वर्ष होते. त्यावषी देशातील अनेक भागांमध्ये थंडीच्या दिवसांची संख्या दुप्पट होती.