कोयनानगर- हेळवाक येथील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वाटण्यात आलेल्या धान्यातील तांदळाच्या पोत्यामध्ये युरिया खत व तांदूळ एकत्रित मिसळले गेलेले लाभार्थ्यांच्या लक्षात आले, ही बाब त्यांनी शेजारच्या महिलांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेने पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आला असून हा प्रकार म्हणजे गरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा असून समंधित विभागाची चौकशी व्हावी असे जनतेतून बोलले जात असून या घटनेने जनतेचा जीव टांगनीला लागला आहे. गरीब जनतेला पोटाला अन्न मिळावे म्हणून शासन स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरजू व गरीब लाभार्थ्यांना गहू व तांदूळ कमी दरात देतं असतें याचा लाभ अनेक कुटुंबाला मिळतो.दर महिन्यात हे धान्य वाटप केले जाते, त्या प्रमाणे या महिन्याचे धान्य हेळवाक येथील लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले असून वितरित केलेल्या तांदळाच्या पोत्यात युरिया खत मिसळलेले आढळून आले असल्याने पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आला. हा प्रकार म्हणजे लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे, या विषयी अधिक माहिती अशी, दर महिन्या प्रमाणे हेळवाक येथे रेशन दुनाकानातून धान्य वाटण्यात आले यावेळी सुतार वस्तीतील नथुराम सुतार यांच्या सुनबाई मयुरी सुतार या धान्य घेऊन घरी गेल्या, त्यानंतर धान्य नीट करण्याच्या निमित्ताने बाहेर घेतले त्यावेळी त्यांनी तांदळाचे पोत्यातील तांदूळ बाहेर घेतले त्यात दगडाचे खडे त्यांना आढळून आले त्यामुळे त्यांनी तांदूळ चायला सुरुवात केली असता चाळणीतून खाली युरिया खत पडू लागले त्यामुळे त्यांनी शेजाराच्या महिलांना हा प्रकार दाखविला महिलांनी रेशन दुकानदार रविंद्र गुरव यांना बोलावून घेतले त्यांनी हा प्रकार पहिला व मी हा प्रकार वरिष्टांच्या कानावर घालतो असे सांगून हे पोते बदलून देतो असे सांगून गेले. तांदळात युरिया खत सापडणे म्हणजे हा प्रकार गरीब जनतेच्या जीवाशी खेळण्या सारखाच गंभीर असून यात दोषी असणारावर कारवाई करावी असे जनतेतून बोलले जात आहे.अनेकवेळा रेशन दुकानात धान्य येते त्यात टोके, सोंडे किडे, खडे अशा प्रकारचा सडलेला गहू लाभार्थ्यांना वितरित केला जातो व विचारायला गेल्यास उद्धट उत्तरे दिली जातात त्यामुळे कोण तक्रार करत नाही तांदळात खत आढळणे हे गलथाण कारभारचे लक्षण असून यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
प्रतिनिधि – विलास कदम