बाजाराच दिवस असल्याने जागा बदलण्याची केली होती मागणी.यात मुख्यमंत्र्यांचा तसेच कोणताही राजकीय दबाव नाही.व्यापारी संघटना व नगरसेवकांनी केले स्पष्ट.
डिचोली/प्रतिनिधी
म्हादई हि आमच्यासाठीही तितकीच महत्वची आणि प्रिय आहे, जितकी ती विविध पक्ष, समाजसेवी संघटनांसाठी आहे. परंतु त्यासाठी साखळीच्या आखवडा बाजाराचा दिवस चुकीचा आहे. कारण साखळीच्या बाजार परिसरात बाजाराच्याच दिवशी बाजारात पूर्णपणे लोकांची व वाहनांची गर्दी असते याच गर्दीत जर भव्य सभा झाली असती तर बाजारातुल संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली असती. त्याचा फटका लोकांनाही बसला असता. आमची म्हादईच्या सभेला हरकत नाही, तर आम्ही केवळ सोमवारी असल्यास जागा बदलावी किंवा दोन वस बदलावा अशी विनंती केली होती, असे स्पष्टीकरण साखळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
सोम. दि. 16 जाने. रोजी साखळीच्या नगरपालिका मैदानावर जनमत कौल दिवस साजरा करण्यासाठी परवानगी मागून त्याला म्हादईच्या आंदोलनाचे स्वरूप देणे गैर आहे. य दिवशी मैदानाची मागणी करणाऱया अर्जदाराने केवळ जनमत कौल दिन साजरा करण्यासाठी एक हजार लोक असणार, असा अर्ज नगरपालिकेला केला होता. परंतु जनमत कौल दिवस साजर करण्याच्या नावाखाली साखळीत म्हादई बचाव आंदोलन उभारण्याची जाहिरातबाजी झाली. त्यास हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत साखळीच्या आठवडा बाजारावर गंभीर परिणाम होण्याची शक्मयता होती. त्यासाठीच व्यापारी संघटनेने नगरपालिकेल पत्र सादर केले होते. व त्यात केवळ जागा बदलण्याची विनंती केली होती. म्हादई ही आमच्यासाठीही प्रियच असून बाजाराचा दिवस सोडून अन्य कोणताही दिवस हि सभा भरविल्यास आम्ही व्यापारी बाजार बंद ठेऊन पाठिंबा देण्यासाठी तयार.आहोत, असेही यावेळी अध्यक्ष सत्यवान काणेकर यांनी म्हटले.
या सभेसाठी मुख्याधीकाऱयांनी सशर्त परवानगी दिली होती. तर परवानगीत काही हरकती आढळून आल्यास ती मागे घेण्यात येणार असे बजावले होते. जनमत कौल दिवस साजरा करण्याचे सांगून म्हादईसाठी भव्य सभा घेण्याची तयारी झाल्याने व त्याच दिवशी बाजाराचा दिवस असल्याने व्यापारी धास्तावले व त्यांनी या सभेची केवळ जागा बदलण्याची मागणी केली. या मागणीला.अनुसरून मुख्याधिकाऱयांनी पालिका मैदानावर दिलेली परवानगी मागे घेतली. यात कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्र्यांचा हात नाही. किंवा कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. याविषयात विनाकारण मुख्यमंत्र्यांना ओढण्यात येत असून नगराध्यक्ष दिशाभूल करीत आहेत. या संदर्भात त्यांनी कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. असे नगरसेवक आनंद काणेकर यांनी म्हटले.
म्हादई हि आमची जिवनदायिनी असून तिचे महत्त्व आम्हा सर्वांना माहित आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सुध्दा याविषयी गंभीर आहेत. या आंदोलनासाठी ठरविण्यात आलेली जागा व दि वस चुकीचा असल्याने मुख्याधीकाऱयांनी आपले अधिकार वापरून परवानगी मागे घेतली आहे. यात कोणालाही दोफ देऊन काहीच फायदा नाही. असे नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी म्हटले.
म्हादईला पाठिंबा देण्यासाठी सरकारने सर्व पंचायती व नगरपालिकांना ठराव घेण्यासाठी हाक मारली होती. परंतु साखळी नगरपालिकेने अद्याप तसा ठराव घेतलेलाच नाही. यावरूनच नगराध्यक्षांना म्हादई कितपत महत्वाची आहे याची जाणीव होते. म्हादईचे महत्त्व काय आहे ते आम्हालाही माहित असून नगराध्यक्ष कोणत्याही विषयी इतर नगरसेवकांना विश्वासात न घेता पालिका मंडळ व प्रशासन हे काम मिश्र करीत आहेत, असे यावेळी नगरसेविका शुभदा सावईकर यांनी म्हटले. यावेळी नगरसेविका रश्मी देसाई, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई यांचीही उपस्थिती होती.