जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे मत
प्रतिनिधी /बेळगाव
देशाच्या विकासात इंजिनिअर्सची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची सेवा अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाची ठरते. ते केवळ तांत्रिकच नव्हे तर प्रशासकीय बाजूसुद्धा उत्तम सांभाळतात. सर एम. विश्वेश्वरय्या हे उत्तम व कुशल इंजिनिअर होतेच. पण ते उत्तम प्रशासकही होते, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे आयोजित ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश जंगल होते. प्रमुख वक्ते म्हणून इंजिनिअर आनंद कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी ‘स्मार्ट इंजिनिअरिंग फॉर अ बेटर वर्ल्ड’ या विषयावर व्याख्यान दिले. उत्तम इंजिनिअर हा निसर्गाकडून प्रेरणा घेत असतो, असे ते म्हणाले.
याप्रसंगी उत्तम कार्याबद्दल संजीव हणमण्णावर, आर. बी. द्यामण्णावर, बी. जी. धरणी, विनय जठार, उदय वाली व आनंद हावण्णावर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा. श्रीकांत अंबेकर यांनी स्वागत केले. व्यंकटेश यांनी परिचय करून दिला. सचिव प्रा. डी. के. वीरण्णा यांनी आभार मानले. प्रा. मंजुनाथ शरणप्पण्णवर यांनी सूत्रसंचालन केले.