अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माझ्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली मी त्याला तप करण्याचा उपदेश केला ते केल्यावर, माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची ब्रह्मदेवाने निर्मिती केली. देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान त्याने ठरविले. या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले. या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळय़ा गती प्राप्त होतात. इंद्रादि सर्व देवांना राहण्यासाठी स्वर्ग हेच स्थान आहे.
यक्ष, राक्षस, भूते आणि गंधर्व ह्यांना रहावयाला आकाश आहे आणि ज्याने मोक्षास जाता येते, जेथून परलोकास जाता येते, ती कर्मभूमी म्हणजे अतळादि सप्त पाताळांसह पृथ्वी होय. थोर भाग्याने मनुष्यास त्यात रहावयास मिळाले आहे. जे सिद्ध असतात ते स्वतः त्रैलोक्मयाच्या वर राहतात. अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, महातळ, तळातळ आणि पाताळ ही पृथ्वीच्या खाली असणाऱया सर्व पाताळांची नावे आहेत. ज्यांचा स्वर्गातील भोग क्षयास जातो आणि अधोभागातील भोग भोगण्याइतकेच पुण्य शिल्लक राहते, त्या पुण्याच्या अनुक्रमाप्रमाणेच ते लोक सप्तपाताळात जन्मास येतात.
ज्याच्या गाठीला फक्त पातकच असते, तो नाना प्रकारच्या नरकांचा उपभोग घेतो. अशी ही त्रिलोकी ब्रह्मदेवानेच स्वतः रचली आहे. उद्धवा! निरिच्छता व विरक्ती यांना एव्हढे महत्त्व आहे की, ज्यांच्या मनामध्ये निरिच्छता नाही, ज्यांनी स्वप्नांतही विरक्ती पाहिलेली नाही, त्यांना खात्रीने त्रैलोक्मयाच्यावर गती मिळत नाही. जे माझी भक्ती करीत नाहीत, जे माझी कीर्ती श्रवण करीत नाहीत, जे संसारबंधनांच्या फेऱयांना तोडणारे माझे रामनाम उच्चारीत नाहीत त्यांना पुनः पुन्हा स्वर्गलोक आणि पुनः पुन्हा नरक भोगावा लागतो. त्यानंतर ते पुनः पुन्हा पाताळलोक व मृत्युलोक ह्यात अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगतात. जे या तीन गुणात गुंतलेले असून सदासर्वदा लोभिष्ट असतात, जे निरंतर सकाम कर्मच करतात, त्यांना त्यांच्या त्रिगुणात्मक धर्माचे फळ मिळतेच मिळते हा पाताळाचा विचार झाला. आता स्वर्गाची रचना ऐक. असेच इतर लोकांचेही सविस्तर वर्णन
सांगेन.
जेथपर्यंत सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश पोचतो, तेथपर्यंत पृथ्वीचे काय ते महत्त्व आहे. लोकांची वस्ती खालच्या पाताळापासून तो अगदी वरच्या स्वर्गलोकापर्यंत अनेक निरनिराळय़ा लोकांमध्ये आहेच. पायांनी चालतात तो भूलोक होय. तेथपासून तो सूर्याच्या अलीकडेपर्यंत आंतरीक्षाचा विस्तार आहे. त्या आंतरिक्षात यक्ष, रक्ष व गंधर्व ह्यांची वस्ती आहे. आंतरिक्षाच्यावर सूर्यलोकाचा विस्तार सुरू होतो. पृथ्वीपासून लक्षावधि योजनावर सूर्यलोक आहे. काळरूपी सूत्रधार हा वायूपासून बनलेल्या चक्रावर सूर्य, चंद्र व तारालोक मोठय़ा कौशल्याने कोंदणात बसविल्याप्रमाणे बसवून त्यांना गरगर फिरवीत असतो. त्या काळावरही माझी सत्ता आहे.
खरोखर माझ्या धाकानेच क्षण, लव, निमिष इत्यादि विभागात तो अधिक-उणेपणा होऊ देत नाही. या कालचक्राची गती मोठी आश्चर्यकारक आहे. एक महिन्याने सूर्य व चंद हे एकत्र येत असतात. नक्षत्रचक्रात चंद्राचे एक परिभ्रमण पूर्ण झाल्यावर आणखी दोन दिवसांनी (एकंदर सुमारे 29 दिवसांनी) चंद्र सूर्याच्या आड येतो. इतक्मयावरूनच त्या दिवशी सजीवपणाने जिवंत असणाऱया (आकाशात प्रत्यक्ष असणाऱया) चंद्राला ज्योतिषी तो नष्ट झाला असे म्हणतात आणि ते लोकांना खरे वाटते.
क्रमशः