वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात पावसाचा जोर वाढल्याने तालुक्मयाच्या पश्चिम भागातील गुंजी तसेच जांबोटी भागातील 11 क्लस्टरमधील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती खानापूर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण एकुंडी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
खानापूर तालुक्मयात दोन दिवसांपसून अतिवृष्टीने अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्मयाच्या पश्चिम भागातील जांबोटी, बैलूर, निलावडे, नागरगाळी, मोहिशेत, गुंजी, कणकुंबी, बिजगर्णी, मनतुर्गा, हलगा, लोंढा, शिरोली या अकरा संपन्मूल विभागातील शाळांना शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.