फळे, पुजेच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठांमध्ये गर्दी
पणजी : जन्मो जन्मी हाच पती मिळूदे! आणि आपल्या पतीराजाचे आयुष्य वाढू दे अशी प्रार्थना कऊन राज्यातील महिला वर्ग आज वट पौर्णिमा उत्सव साजरा करतील. त्यानिमित्त वडाच्या पेडावर जाऊन धागा धऊन पेडाला 7 प्रदक्षिणाही काढतील. आज वट पौर्णिमा सर्व विवाहित महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस. आजच्या दिनी महान प्रतिव्रता सावित्रीने आपला पती सत्यवानचे प्राण घेऊन जाण्यास आलेल्या यमासमोर आव्हान उभे केले. वाडाखाली बसून तीन दिवस कडक उपासही केला होता. यमराजाकडून तिने तीन वर मागून घेतले. वर देऊन यम फसला आणि सावित्रीला त्याने सत्यवानाचे प्राण परत आणून दिले व सत्यवान परत जिवंत झाल्याची एक पौराणिक कथा आहे. या आधारित पारंपरिक पद्धतीने प्रथेने वट पौर्णिमेचे व्रत सौभाग्यवर्ता महिला आचरणात आणतात. काही महिला तीन दिवस कडक उपास धरतात. तर कित्येक महिला या एकच दिवस म्हणजेच पौर्णिमेदिवशी उपास धरतात.
पारंपरिक पद्धतीने घरात वडाची फांदी वाळूमध्ये उभाऊन त्याची यथासांग पुजा करतात आणि महिला एकमेकांना फळफळावळांची वाणं देतात. ज्या ज्या गावांमध्ये वडाभोवती पेड बांधलेले आहे अशा वडाच्या झाडाभोवती धाग्याने फेरे धऊन वडाची पुजा केली जाते. आज गोव्यात सर्वत्र हे चित्र दिसून येईल. नउवारी साड्या नेसून वडाला फेरे घालून महिला वर्ग वडाची पुजा करीत असल्याचे दृष्य जागोजागी दिसेल. दरम्यान, राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गोव्यातील पारंपरिक फळे तसेच वट पौर्णिमेला लागणारे साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. हिरवी कंकणे, धागा, वेळूची सुपे, विविध पारंपरिक प्रकारची फळे इत्यादी सामानाची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. पणजी, म्हापसा, फोंडा, डिचोली, सांखळी, कुडचडे, मडगाव, वास्को बाजारपेठांमध्ये महिलांनी वटपौर्णिमेला लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.