सांखळी शहर परिसरातील पालकांची मागणी
प्रतिनिधी/ सांखळी
सोमवार दि. 5 जून रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने सकाळी शाळा भरताना आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होत असते. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी सांखळी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची बरीच गर्दी पाहायला मिळते. मात्र येथील वाहतूक पोलिसांनी चांगली कामगिरी बाजावल्यास विद्यार्थी व नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार नाही.
वाहने काळजीपूर्वक चालवा : मुख्यमंत्री
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याने शाळा परिसरात मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठा गर्दी होत असते. विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी. नागरिकांनी ही विशेष काळजी घेतल्यास समस्या निर्माण होणार नाही. वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केले व सोमवारपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.