सामाजिक मुद्दय़ावर आधारित चित्रपट
अभिनेता रणवीर सिंह याचा चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर याची कहाणी आणि त्याच्या विषयासंबंधी आता माहिती समोर आली आहे. जयेशभाई जोरदार चित्रपटात एक सामाजिक विषय हाताळण्यात आला असून याला विनोदाचा स्पर्श देण्यात आला आहे.
हा चित्रपट 13 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि शालिनी पांडे यांच्यासह बोमन इराणी तसेच रत्ना पाठक यांच्यासारखे दमदार कलाकार दिसून येतील.
या चित्रपटात भ्रूण हत्या आणि स्त्राr-पुरुष समानता यासारख्या सामाजिक विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. चित्रपटातून गुजरातमधील सुंदर दृश्य तसेच बोलीभाषेचा आनंद घेता येणार आहे. दिव्यांग ठक्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्म्सकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामधून शालिनी पांडे ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी तिने तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डीतील स्वतःच्या भूमिकेने मोठी प्रसिद्धी मिळविली होती.