संपन्न, धवऊख व विद्या प्रबोधिनी कॉलेज,पर्वरी संयुक्त उपक्रम.
हरमल : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धवऊख संस्था मांद्रे व विद्या प्रबोधिनी कॉलेज,पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने मांद्रे जुनसवाडा पठारावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा केला. यावेळी धवऊख संस्थेचे ऊद्रेश म्हामल यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने भविष्यासाठी एक झाड लावून पर्यवरणाचे रक्षण केले पाहिजे.झाड शुद्ध हवा वातावरणात सोडीत असते, त्याचा फार उपयोग होत असतो.धवऊख संस्थेने पर्यावरणाच्या जतनासाठी वाहून घेतले असून पर्वरीच्या कॉलेज बरोबर सामंजस्य करार केल्याने संस्थेने आजमितीला कित्येक झाडे लावली व झाडे लावणे हा उद्देश नसून ती झाडे योग्य जगली पाहिजे,हा आमचा उद्देश असतो व त्यात यश मिळत असल्याचे म्हामल यांनी व्यक्त केले.धवऊख संस्थेने पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे.पर्यावरणावर प्रेम असलेल्या प्रत्येकांनी झाडे लावली पाहिजे.सद्यकाळात पर्यावरणीय बदल खूपच वेगाने बदलत असून पाऊस कमी,हिट व्हेव तापमान वाढ व अन्य परिणामी टाळण्यासाठी झाडांची लागवड व त्याचे संवर्धन फायद्याचे ठरते,असे डॉ उद्धव पोळ यांनी व्यक्त केले.सध्या कित्येक भागांत झाडांची कत्तल व डोंगराचे सपाटीकरण होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होईल,त्यासाठी आतापासूनच झाडाची लागवड व काळजी घेतल्यास भविष्यात भारत देश सुजलाम सुफलाम व हरित क्रांती निर्माण होईल,असे एका युवकाने सांगितले. सध्याच्या काळात झाडे जगल्यास पाऊस,पाणी वेळेत मिळेल व त्यासाठी झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे धवऊखचे सदस्य कल्पेश नाईक यांनी व्यक्त केले.यावेळी जुनसवाडा पठार व डोंगर उतरणीवर युवा सदस्यांनी झाडे लावून जगवण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान, धवऊख व विद्या प्रबोधिनी कॉलेजच्या सदस्यांच्ये सर्व थरांतून अभिनंदन होत होते.