लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शानदार समारोप
कोल्हापूर प्रतिनिधी
बोहडा, तारपा, लावणी, कर्बल, लेझीम, सोंगी मुखवटे, डोल्लू कुनिता (ढोल नृत्य), दिवली, कोळी आदी नृत्य प्रकार विविध राज्यातील 120 कलावंतांनी रविवारी सायंकाळी सादर कऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांनी या कलाकारांना टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
छत्रपती शाहू मिल येथे गेल्या आठ दिवसांपासून सुऊ असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित महोत्सवाचा शानदार समारोप झाला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या समारोप सत्रात विविध राज्यातेल लोककलाकारांकडून नृत्याविष्काराद्वारे राजर्षी शाहूंना मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, नवीन पिढीसमोर राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समोर आणणे हे या कृतज्ञता पर्वाचे उद्दिष्ट होते. राजर्षी शाहूंचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली ठरेल. जातीभेदाला कोणत्याही प्रकारे थारा न देणे हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल. फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवरच राज्य व देश अधिक गतीने वाटचाल करेल. या महोत्सवासाठी पालकमंत्री यांच्यासह जिह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, इतर सर्व संस्था, संघटना, स्वयंसेवकांनी केलेली मदत अविस्मरणीय आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात नाशिक येथील आदिवासींचे बोहडा, पालघर येथील तारपा, तसेच लावणी, कर्बल, लेझीम, सोंगी मुखवटे, डोल्लू कुनिता (ढोल नृत्य), दिवली, कोळी आदी नृत्य प्रकार विविध राज्यातील कलावंतांनी सादर कऊन उपस्थित कलारसिकांची वाहवा मिळविली. दरम्यान यावेळी कृतज्ञता पर्वामध्ये योगदान देणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी कृतज्ञता पर्व संयोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य अजेय दळवी, आदित्य बेडेकर, सुखदेव गिरी, डॉ. कविता गगराणी, प्रा. डॉ. महादेव नरके, प्रसन्न मालेकर, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे, वसीम सरकवास, संदेश जोशी आदींसह शाहूप्रेमी उपस्थित होते.
महोत्सवात एक कोटीची उलाढाल
गेले आठ दिवस सुऊ असलेल्या या महोत्सवात अंदाजे एक कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. यामध्ये सर्वाधिक उलाढाल आंबा महोत्सव स्टॉलमध्ये सुमारे 35 लाख रुपये इतकी झाली. त्याचबरोबर इतर 108 स्टॉल मधून सुमारे 25 लाख रुपये, खाद्य जत्रेत 17 लाख, कापड विभागामध्ये 15 लाख, पुस्तके व इतर स्टॉलद्वारे सुमारे 20 लाख रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.