हरळय्या समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहरातील शहापूर, खासबाग, वडगाव व इतर परिसरात मोठ्या प्रमाणात हरळय्या समाज राहतो. मात्र या समाजाकडे नेहमीच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हरळय्या समाजाचे संत समगार हरळय्या यांची जयंती दरवषी साजरी केली जाते. मात्र या समाजाला कधीच त्याची माहिती दिली जात नाही. एकप्रकारे आपल्यावर अन्याय होत आहे, असा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी हरळय्या समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हरळय्या समाजाचे संत समगार हरळय्या यांनी केवळ या समाजालाच मार्गदर्शन केले नाही, तर इतर घटकांनाही मार्गदर्शन केले आहे. त्यांचे कार्य मोठे आहे. दरवषी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांची जयंती साजरी केली जाते. ही जयंती साजरी करताना एकाचवेळी चार महापुऊषांची जयंती साजरी करण्यात येते. मात्र हरळय्या समाजाला कधीच विश्वासात घेतले जात नाही. गुऊवारी याबाबत कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी साधी भेटही दिली नाही. त्यामुळे आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असून त्यामध्ये वेळीच बदल करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, गणेश काळे, सुभाष कांबळे, सागर लाटे, संजय पवार, रवी शिंदे यांच्यासह हरळय्या समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते