ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप हा पक्ष आहे की चोरबाजर आहे. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतेय. त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झालाय, असा हल्लाबोल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली (Chikhali) गावात शिवसेनेचा शेतकरी मेळावा (Shetkari Melava) आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
भाजप (BJP) हा पक्ष आहे की चोरबाजर आहे. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतेय. त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झालाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. पण जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा त्यांची मालमत्ता आहे. पण तुम्हाला पाहिल्यानंतर धगधगत्या मशाली असल्यासारखं वाटतेय. आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं. पण यांनी सरकार पाडलं. पण यांची पाडायची पद्धत कशी आहे, असे ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र
भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार आणि नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का?, हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत यादी काढा मग तुम्हाला समजेल की, यांच्या पक्षामध्ये आयात केलेले किती लोक आहेत. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच हा आयात पक्ष आहे. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. आपल्या पक्षातले नेते संपले की बाहेरून चोरून घ्यायचे. म्हणूनच माझा या ४० रेड्यांना सवाल आहे की, त्यांच्यामध्ये मर्दांगी शिल्लक असेल तर, त्यांनी जाहीर सांगावे की, आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही. त्यांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे. चेहरा पाहिजे आणि मोदींचे आशिर्वाद पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.