सावंतवाडी / प्रतिनिधी
वंदे भारत एक्सप्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखीन थांबे देण्यात यावेत तसेच सावंतवाडी – मळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढील टप्प्यात लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी रेल्वे स्थानकाला वंदे भारतलाच थांबा देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दोन थांबे तर गोवा येथेही दोन थांबे देण्यात आले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली रेल्वे स्थानकावरच या रेल्वेला थांबा आहे सावंतवाडी त येथेही थांबा मिळावा ही मागणी केसरकारांना मार्फत करण्यात आली .