प्रतिनिधी/ वाळपई
महिलांच्या पारंपरिक परंपरेचा भाग असलेला वटपौर्णिमेचा उत्सव सत्तरी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये शेकडो महिलांनी भाग घेतला होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वडाची पूजा करून त्यांना सातफेरे घालून उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे पाऊस नसल्याने महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही.
याबाबतची माहिती अशी की, वटपौर्णिमा साजरा करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून ऊढ झालेली आहे. सौभाग्यवती महिला भगिनी या पारंपरिक उत्सवानिमित्त उपवास करतात व आपल्या पतीसाठी विशेष आयुष्य मागत असतात. सत्तरी तालुक्यात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून दुपारपर्यंत विविध ठिकाणी वडाच्या झाडाला फेरे घालून व त्याचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून हा उत्सव साजरा करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले.
काही महिलांनी घरातच वडाच्या फांद्या आणून वडाची पूजा करण्यावर भर दिला. अनेक ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात महिला भगिनी प्रत्यक्षपणे वडाची पूजा करताना दिसत होत्या.
महिलांनी पारंपरिक वेष परिधान केला होता. काही ठिकाणी सकाळी ब्राह्मणाकरवी पूजाअर्चा करण्यात आली व त्यानंतर महिलांनी हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला. सामान्यपणे पारंपरिकरित्या वटपौर्णिमा साजरी केली जाते.
वडाची पूजा करून वटपौर्णिमेचा सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असा संदेश देणारा हा पारंपरिक उत्सव म्हणजे सौभाग्यवती महिलांसाठी आनंद व्यक्त करणारी एक वेगळी प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया यावेळी सावर्डे येथील महिमा गावकर यांनी व्यक्त केली.
होंडा सत्तरी येथील अंजली नाईक म्हणाल्या, वटपौर्णिमा उत्सवाची पूर्वतयारी करताना आनंद असतो. ही सौभाग्यवती महिलांसाठी अशा प्रकारचे सणांमध्ये सहभागी होण्यात महिलांना एक विशेष असा सन्मान प्राप्त होतो
यांनी .पारंपारिक उत्सव पारंपरिक सण हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहे. याद्वारे पारंपरिक संस्कृती संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज असल्याची त्यांनी आपली प्रतिक्रिया ठाणे येथील प्रियदर्शनी गावकर यांनी व्यक्त केली.