म्हापसा : कोलवाळ रामनगर भागात गेल्या 3 दिवसापासून वीज गुल झाल्याने येथील ग्रामस्थ ऐन उन्हाळ्यात हैराण झाले आहेत. हा वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरू न केल्यास कोणीवाडा व रामनगर येथील ग्रामस्थांनी वीज खात्यावर मोर्चा नेण्याचे ठरविले आहे. रामनगर व कोणीवाडा येथे तीन दिवस वीज गुल आहे. उकाडा वाढत असून पावसाचाही थांगपत्ता नाही. पावसात काय होणार हे सांगता येत नाही. वीज खाते व स्थानिक मंत्र्यांनी गावातील समस्या सोडवावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा स्थानिक पंचसदस्य रितेश वारखंडकर यांनी दिला. गेले दोन दिवस येथे वीज नसल्याने नवीन ट्रान्सफॉर्मर घालून देतो असे सांगण्यात येत आहे. येथे ट्रान्सफॉर्मर घातला तरीही वीज नाही. वीज येते-जाते. सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथील लोड कमी करण्यासाठी नवीन वीज तारा घालण्यात येत असल्याची माहिती अभियंता वर्गांनी दिली आहे. प्रथम ट्रान्सफॉर्मर जळला असे सांगण्यात आले. दुसरा ट्रान्सफॉर्मर घातला तरी वीज पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. थिवीतून पेडणे औद्योगिक वसाहतीत भूमिगत वाहिन्या देण्यास सरकार मान्य करतो मात्र गावाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष नाही. कोलवाळ येथे भूमिगत वीजवाहिन्या घालाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. गावात आज वीजपुरवठा तीन दिवसापासून नाही. आम्हाला व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही. मंत्र्यांनी आम्हाला अन्य ट्रान्सफॉर्मर देतो असे आश्वासन दिले आहे असे रामनगरच्या पंच शीतल सतीश चोडणकर म्हणाल्या.
Previous Articleकवि विनोद नाईक यांच्या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Next Article पणजीत पोलीस अधिकाऱ्यांशी ज्वेलर्स असोसिएशनची बैठक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.