मुंबईतील जून महिन्यातील पावसाची सरासरी 537 मिमी इतकी आहे. यापेक्षा पाऊस झाल्यास पाणी कपात अटळ असते. म्हणजे मुंबई पालिका तसा निर्णय घेते. 2023-24 म्हणजे या वर्षात 7.12 टक्के पाणी पट्टीत वाढ करणार असे पालिकेकडून ठरत असल्याचे समजत आहे. पाणी पट्टीत वाढ हे व्यावहारिक गणिते मिटवू शकते. मात्र शहराची तहान भागवू शकत नाही…
बुधवार ते रविवार राज्यातील वातावरणीय स्थितीत बदल होताना fिदसून आले. हे बदल आशा दाखवणारे तसेच ते निराश करणारे ही ठरू शकतात. निसर्गावर कोणाचे नियंत्रण असू शकत नाही. मात्र मुंबईसाठी तुर्तास मान्सूनबाबत सकारात्मक बदल हवे आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांची स्थिती बऱ्याचअंशी नकारात्मक स्थितीकडे वळलेली दिसून येते. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार 4 जून रोजी 1,74,093 दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध आहे. तर गेल्यावर्षी याच वेळेत 2022 मध्ये 2,34,519 दशलक्ष लिटर एवढा साठा होता. त्याही आधी 2021 मध्ये 1,97,059 दशलक्ष लिटर एवढा साठा होता. या तिन्ही वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्याने खालची पातळी गाठली असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई शहरासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. रविवारी राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत असताना ठाणे जिह्यातील शहापूर तालुक्यातील पावसाची नोंद मुंबईला आशा दर्शविणारी ठरली. कारण शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आहेत. ठाणे जिह्यात होणाऱ्या पावसामुळेच धरणक्षेत्रात पाणी साठवले जाते. यातूनच संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे ठाणे जिह्यातील पाऊस प्रमाण मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. त्याचवेळी यंदा राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस राहणार असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. तर राज्यात सुऊवातीच्या जून, जुलै या दोन महिन्यात पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. याची चाहूल आतापासून लागली आहे. तसेच ऑगस्टमध्ये पाऊस साधारण गटातील सरासरी गाठेल असा अंदाज आहे. त्याच वेळी हे वर्ष एल-निनोचे राहणार आहे. त्यातून राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच जून महिन्यात पाऊस कमी तर उष्णता अधिक राहण्याचा अंदाज केला गेला आहे. जून महिन्याच्या सुरवातीलाच कमी पावसाची लक्षणे दिसू लागली आहेत. 4 ते 8 जून पर्यन्त संपूर्ण विदर्भ व लातूर नांदेड परभणी जिह्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कदाचित जाणवू शकते. म्हणजेच जून महिन्यात कमी पाऊस व अधिक उष्णता असे भाकितानुसार सुरवातीलाच दिसू लागल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. तर मान्सून काही काळ अंदमानातच रेंगाळलेला दिसला. मान्सूनच्या मार्गक्रमणाचा वेग अपेक्षित असा नाही. देशातील भू-भागावर भाकिताच्या अचूक तारखेला आगमनाच्या शक्यतेलाही नकळत चकवा बसत आहे. त्यामुळेच निव्वळ वातावरण अनुकूल असून चालत नसून मान्सूनने झेप घेणेही गरजेचे आहे. या वातावरणीय स्थितीसोबत बुधवारी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या वातावरणीय स्थितीचा मान्सूनच्या विकासात साधक बाधक परिणाम होऊ शकतो. या स्थितीमुळे कदाचित मान्सूनचे आगमन वेगात येऊ शकते किंवा आगमनानंतर मान्सूनच्या प्रगतीवर बंधन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत. मात्र मान्सून वेगही घेऊ शकतो या अंदाजात सकारात्मकता दिसून येते. मान्सून लवकर अवतरल्यास मुंबई सारख्या शहरांतील पाणी पुरवठा समस्या सुटू शकतात. दरम्यान मोसमी वाऱ्याने समाधानकारक वाटचाल सुरू ठेवली असून शुक्रवारी लक्षद्वीप बेटांचा काही भाग आणि दक्षिण श्रीलंकेत वाटचाल केल्याचे हवामान विभागाने सांगितले. मोसमी वारे दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाले असताना काही काळासाठी या मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली होती. अंदाजानुसार केरळ आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये मान्सून वारे दाखल होण्याचा अंदाज करण्यात आला. यात महाराष्ट्र आणि तेलंगणात 10 जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या सुरवातीला काही भागात पूर्व मोसमी हंगामात तयार होणारे स्थानिक पातळीवर उष्णतेतून हवेचे घडणारे उर्ध्वगमन व नंतर अधिक उंचीवरील सांद्रीभवन प्रक्रियेतून पाऊस दिसत असला तरी हा पूर्व-मोसमी पाऊस आहे. हा पूर्व मान्सून पाऊसच रविवारी राज्यभरात ठिकठिकाणी झाला. हा पाऊस मुख्य मान्सून नसून मुख्य मान्सून काळातच शहरांना पाणी पुरवठा करणारे जलस्त्राssत म्हणजे उपलब्ध धरण साठ्यांना फायदा होतो. पूर्व मान्सूनच्या काळात कधी फिऊन ऊनही पडू शकते. तर कधी वाऱ्यासोबत पाऊस जाऊ शकतो.
एकंदरीत पाऊस प्रमाण पाहिल्यास दर अडीच ते तीन वर्षांनी मान्सून लांबण्याची स्थिती निर्माण होते. बरे हे सर्व ठराविक काळानंतर सातत्याने घडत असूनही त्यासाठी आपण पुरेसे गंभीर नसल्याचेच समोर येत आहे. ज्या वर्षी पाऊस चांगला पडतो त्या वर्षी आपण सुशेगात स्थितीत असतो. तर ज्या वर्षी पाऊस प्रमाण कमी असेल त्यावर्षी जो तो पाऊस साठवण्याच्या चर्चा करतो. मात्र पावसाचे प्रमाण काही मिमीने देखील वाढले तरी, ती चिंता सरकार, प्रशासन, नागरिक सर्वजण विसऊन जातात. मान्सून आगमनाची सुवार्ता ऐकण्यास ग्रामीण, शहरी भागातील सर्वजण ऐकायला उत्सुक असतात. मात्र त्यावरील खात्रीलायक बोलण्यास कोणीच तयार नसते. मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजावर शेती, व्यवसाय, कारखानदारी एकंदरीत मानवी जीवनमान अवलंबून असते. अंदाजानुसार पाऊस झाल्यास पावसाचे नियोजन करण्यासही प्रशासन, सरकारला वेळ मिळून नियोजीत योजना तयार करता येणे शक्य होते.
दरम्यान रविवारी राज्यभरात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी वातावरणीय पाऊसपूर्व तयारी दिसून येत होती. अगदी आपल्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातदेखील पावसाने अर्धा तास तरी हजेरी लावली. यातून राज्यात वळीव पावसाला जोर दिसून आला. दरम्यान बुधवारी 7 जून रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास वातावरणीय या स्थितीमुळेच मान्सूनचे आगमन कदाचित वेगात असू शकते किंवा आगमनानंतर प्रगतीला खंडही पडू शकतो. तुर्तास या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून विकासाने वेग घेतल्यास मुंबईसाठी मदतपूर्ण ठऊ शकते ही आशा..
राम खांदारे