कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ः नागरिकांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
पाण्याशिवाय आपला एक क्षण जात नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्या दैनंदिन उपक्रमात पाण्याची गरज लागतेच. पाणी ही मौल्यवान वस्तू आहे. याची जाण ठेवून आणि भविष्यात त्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई उद्भवणार आहे, याचे भान ठेवून सध्या पाण्याचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असताना अनेक ठिकाणी आपण पाणी वाया घालण्याचे प्रकार पाहत असतो. कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार निदर्शनास आला आहे. पावसाळय़ामध्येही झाडांना पाणी सोडण्याचा प्रताप करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित डॉक्टरांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बेहिशेबी पाणी उपसून ते वाया घालविण्यात अर्थ नाही. किमान डॉक्टरांना तरी याबाबतचे भान असणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. पाण्याचा थेंबन् थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. यासाठी प्रशासन वारंवार जागृती करत असते. मात्र, कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वरि÷ डॉक्टरांनी संबंधित कर्मचाऱयांना पावसाळय़ात बागेत पाणी सोडण्यापेक्षा अंतर्गत स्वच्छतेवर भर देण्याची जबाबदारी दिली पाहिजे.
पाणी संपले तर काय होईल? याचे भान नसलेली मंडळी अकारण पाण्याचा अपव्यय आणि नासाडी करतात. हे थांबण्याची खऱया अर्थाने गरज आहे. आमची स्वतःची विहीर आहे किंवा स्वतःची बोअर आहे, असे म्हणत भरमसाट पाणी ओतणे हे निसर्ग नियमाविरुद्ध आहे. सरकारी अधिकारीच असे बेजबाबदार वागत असतील तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी प्रत्येकाला पाण्याचे महत्त्व सांगण्याची गरज आहे. मात्र, डॉक्टर नोकरी एके नोकरी करून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तसे पाहता कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठा भार आहे. मात्र, येथील कर्मचाऱयांच्या गलथान कारभारामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आलेल्या रुग्णांशी बेजबाबदारपणे वागण्याचे प्रकार घडत आहेत. याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. पावसाळय़ात पाणी सोडण्यापेक्षा त्याचा उपयोग उन्हाळय़ात करावा, अशी मागणी होत आहे.