पंपिंग करून पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी : यंत्रणा सज्ज
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात गेल्या पंधरा दिवसांपासून धुवांधार कोसळणाऱया पावसामुळे पिसुर्ले येथील खनिज खंदकात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पिसुर्ले भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे या खंदकातील पाणी पंपिंग करून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील दोन ठिकाणी खनिज खंदकामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साठलेले आहे. सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत आहे. यामुळे पाण्याची पातळी झापाटय़ाने वाढत आहे.
पंपाची यंत्रणा सज्ज
खदकांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्मयता असल्यामुळे या ठिकाणी पंपाची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या एकूण तीन पंप बसविण्यात आलेले आहेत. मात्र ते अद्याप सुरू केलेले नाहीत. खंदकांमधील पाण्याची पातळी आता जमीन समांतर आली असून कोणत्याही क्षणी पाण्याचा निचरा होण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास सदर पाणी पिसुर्ले भागातील देऊळवाडा व इतर परिसरामध्ये येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भीती बाळगण्याची गरज नाही : उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार कौशिक देसाई, जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे व इतरांनी घटनास्थळी भेट घेऊन या संदर्भाची पाहणी केली. अद्याप पाण्याची पातळी नियंत्रणात आहे. यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. सदर ठिकाणी पंप बसविण्यात आले असून कोणत्याही क्षणी सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आलेली आहे. तशीच गरज वाटल्यास झाल्यास पंपिंग केले जाईल, असेही उपजिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.