संतोष पाटील, कोल्हापूर
पिंपरी चिंचवाड, कल्याण डोंबीवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह उत्तर भारतातील बहुतांश मोठ्या शहरात घराबाहेरी पाणी मिटर चोरीचे प्रकार सर्रास घडतात. चोरीच्या एका मिटरची ग्रे मार्केटमध्ये साधारण आठशे ते हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. चोरीनंतर तक्रार, पोलीस तपास, गुन्हेप्रकटीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याचा फायदा घेवून मिटरचोरांचे धाडस वाढतच आहे. मागील महिन्याभरात शिवाजीपेठ, कदमवाडीत सलग 20 ते 25 मिटर चोरी गेल्यानंतर आता कसबा बावड्यातील आंबेगल्लीत रात्रीत 20 मिटर लंपास झाले. मिटर चोरी ही बाब साधी वाटत असली तरी नवीन मिटर बसवण्यासाठी सरासरी चार हजारांचा खर्च, दोन-तीन दिवस पाणी कपात असा मनस्ताप सहन करावा लागतो. पोलीस, महापालिका यंत्रणेनं वावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
यापूर्वी पाणी मिटरवर बीड धातूचं किमान पंधरा किलो वजनाचे झाकण मिटरसोबतच मोफत मिळायचे. ओलसर ठिकाणी पाणी मिटर असल्याने तपासणारा हातातील लोखंडी गज या झाकणावर वाजवत असे. झाकणाच्या आत सर्रास लपलेले उंदीर, किडे तसेच साप यामुळे बाहेर येत. मग झाकण काढून पाणी मिटरची तपासणी होत असे. मागील काही वर्षात ही झाकणं चोरीला जाण्याचे प्रकार वाढले. आता तर झाकणं ही दुर्मिळ बाब बनली आहे. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पाणी मिटर लंपास करण्याकडे वळवला आहे. मीटरचोरीमुळे पाणी वाया गेल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहेच, मात्र चोरीला गेलेले मीटर बसवण्यास किमान चार हजारांचा खर्च येतो. पाणी मिटर आतील बाजूस सुरक्षित बसवले तर मिटर तपासणारे कारकूर करतात. यावर ठोस उपायांजी गरज असल्याचे रणजित नायकवडे यांनी सांगितले. शिवाजीपेठ, कदमवाडी, आणि कसबा बावडा झाला आता पुढील भागात मिटरचोरांनी डल्ला मारण्याअगोदर पोलीस आणि महापालिका यंत्रणेनं किमान कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.
ग्रेम मार्केटमध्ये चलती
नवी मुंबई महापालिका (एनएमएमसी) परिसरात मागील पाच महिन्यात सोळा लाख रूपयांची मिटर चोरीला गेली. मीटर चोरीला गेल्यास, रहिवाशांनी प्रथम पोलिस तक्रार दाखल केली पाहिजे आणि त्या प्रतचे कारण देऊन नवीन वॉटर मीटर बसवण्याची विनंती करावी लागते. चोरी पहिल्यांदाच घडली असेल, एनएमएमसी रहिवाशांकडून शुल्क न आकारता नवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर बसवते, परंतु दुस्रयांदा, ग्राहकाला वॉटर मीटरची किंमत सुमारे 1800 रुपये आकारणी केली जाते. बहुतेक मीटरला ब्रास गेज असते आणि त्यांना भंगार बाजारात चांगली किंमत मिळते. असे चोरीचे मीटर ग्रे मार्केटमध्ये हजार रुपयांना सहज उपलब्ध आहेत, म्हणून चोर हे मीटर लक्ष्य करतात.
पोलीसांची रात्रीची गस्त कागदावरच
सांगवी परिसरातून अंदाजे 40 पाणी मीटर चोरीची तक्रारीनंतर पोलीसांची रात्र गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे माजी सरचिटणीस कुंदन कसबे यांनी आंदोलन करुन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीनंतर दखल गेली. कोल्हापुरातही रात्रीची गस्त घातली जाते. मात्र ही गस्त कागदावरच असावी, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. रात्री रस्त्यावरुन फिरुन पडलेल्या वस्तू गोळा कराव्यात तसे चोर मिटर चोरत आहेत. पोलीसांचा धाकच राहिला नसल्याचे हे द्योतक आहे. मिटर चोरीला गेल्यानंतर नवीस मिटरसाठी सुमारे चार हजार तसेच दोन-तीन दिवसांचा पाणी पुरठा खंडीत झाल्याचे मनस्ताप सहन करावा लागतो. चोरीसाठी सामुदायिक तक्रार करण्याची गरज आहे. तक्रार होत नसल्याने चोरांचे धाडस वाढत आहे. मीटर चोरीला गेल्यानंतर पोलीसात तक्रार देण्याची मुभा आहे. परिरसरातील असे नामचिन चोर तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस याप्रकारणी छडा लावू शकतात. भादंवि कलम 379, 411, 414 आणि 34 नुसार गुन्हा (सीआर क्र. 331/11) दाखल करण्यात येतो.
पाणी तपसणीचा रुबाबच न्यारा
पाणी मिटर सुरक्षित रहावे यासाठी खोलगट भागात तसेच कौंपोंडच्या आत बसवतात. परंतू अशा मिटरची तपासणीस संबंधित नाखूस असतात. कारकूर करतात. मिटर तपासणी ही ठोक मानधनावरील कर्मच्रायांवर अवलंबून आहे. ज्याची जबाबदारी आहे ती व्यक्ती चार महिन्यातून एकदा येते. मिटरवरील फरशी काढणे लांबच मिटरचे लहान टोपण उघडण्यासही मदतणीस लागतो. दुस्रयाने झाकण उघडून रिडींग सांगितल्यावर लिहण्याची तसदी मुख्य रिडर घेतो. महापालिकेची चाकरी गरज म्हणून नव्हे तर रुबाबासाठी करण्राया अशा कर्मच्रायांना वठणीवर आणावे लागेल. अशा मस्तीखोरांमुळेच नागरिकांना नाहक त्रास होतोय. कर्मच्रायांची संख्या कमी असल्याचे छापील उत्तर देवून प्रशासन अशा मस्तीखोरांवर पांघरुन घालतेय.