पुणे, जळगाव / प्रतिनिधी :
आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो. त्याचेच हे फळ आहे, अशा शब्दांत ज्ञानपीठविजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपला संताप येथे व्यक्त केला.
जळगावातील एका कार्यक्रमानंतर बोलताना ते बोलत होते. डॉ. म्हणाले, दहा ते पंधरा टक्के लोकांचे सध्या व्यवस्थित चालले आहे. बाकींच्या स्थिती बिकट आहे. अनेकांना मात्र उद्या काय खावे, याची काळजी आहे. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. 60 टक्के लोक अपुरे राहतात. नीट सगळय़ा गोष्टी मिळणे, मूलभूत गरजा भागणे, या गोष्टी त्यांच्याबाबत होत नाहीत. कुणाला मत देतोय, हे कळल्याशिवाय आपल्यात सुधारणा कशी होणार? त्यामुळे आता कोणाला निवडून द्यावे, याचा विचार केला पाहिजे. तरच या लोकशाहीचा उपयोग होईल.
अधिक वाचा : मी सरकारविरूद्ध बोलणार नाही; पुरस्कार नाकारल्याच्या मुद्यावर डॉ. सदानंद मोरेंची पलायनवादी भूमिका
नेमके कोण चांगले, हे आपल्याला कळत नाही. चांगल्या लोकांनी राजकारणात पडू नये, असे सध्या झाले आहे. सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालेल का, आपल्या सारख्याला हे शक्य नाही, असे सांगत लोक जर असेच मूर्ख राहिले, तर असलेच सरकार येत राहणार. राष्ट्रवादामुळे आपल्या देशाचे नुकसान होत आहे. मुसलमानांपासून सर्वांनीच या देशाला पुढे आणले आहे, याकडेही डॉ. नेमाडे यांनी लक्ष वेधले.