जिल्ह्dयात सुमारे 30 हजार कर्मचारी संपावर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ या घोषणेनुसार सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी मंगळवारी राज्यभर पुकारलेल्या बेमुदत संपात जिह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संपात सुमारे 30 हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम जिह्यातील सर्व प्रशासकीय कारभार ठप्प झाला असून या कार्यालयांत शुकशुकाट पहायला मिळाला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जुनी पेन्शन योजना लागू करा तसेच पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्यावी, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता देण्यात यावी, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवावी, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मच्रायांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
या संपात जिह्यातील सुमारे 25 ते 30 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हा महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, आरोग्य विभागाचे कर्मचारी संपात उतरल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर सर्व कर्मचारी संघटना एकत्र आल्या. कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मोठ्या संख्येने कर्मचारी संपात उतरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती.