आयपीएचबी कंत्रीटी कामगारांचा प्रश्न
प्रतिनिधी /पणजी
सरकारने आयपेएचबीमध्ये 190 नवी पदे भरली असून ती कायम स्वरूपी आहेत. मग आम्हालाच का डावलण्यात येत आहे असा प्रश्न आयपेचपी कंत्राटी कामगारांनी केला आहे. सरकार 190 पदे भरू शकतो तर गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहोत. मग आम्हाला नोकरीत का घेत नाही. अनुभव असलेल्या कामगारांना डावलून नव्या कर्मचाऱयांना घेण्यामागे सरकारचा काय हेतू आहे असेही त्यांनी सांगितले. सरकार आम्हाला नोकरीत घेत नाही तोपर्यंत आमचा संप चालूच रहाणार असा इशाराही कंत्राटी कामगारांनी दिला आहे.
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत गोवेकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सिध्देश साळगावकर, महादेव परब तसेच अन्य 25 कंत्राटी कामगार उपस्थित होते. आम्हाला परत नोकरीत घ्या या मागणीसाठी आयपीएचपी कंत्राटी कामगार गेल्या 19 दिवसांपासून येथील आझाद मैदानावर ठांड मांडून आहेत. मध्यंतरी आम्ही आमरण उपेषण करण्याचे ठरवीले होते. मात्र जिल्हाधिकाऱयांनी आम्हाला मान्यता दिली नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत मात्र सरकार आमच्या विरोधात सावत्रपणाची भूमीका का घेत आहे आसा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून केवळ उद्याच्या आशेवर तुटपूंजा पगारावर आम्ही काम करीत होतो. एकूण 28 कामगारांपैकी कित्येकजणांचे वयही उलटून गेले आहे. त्यामुळे आता दुसरी नोकरी कशी मिळेल हे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. काही जणांची मुले शिकतात तर काहींचा संसार याच नोकरीवर अवलंबून आहे. नोकरी गेली तर संसार उघडय़ावर येणार आहे. सरकारला आमची दयामाया कशी येत नाही असेही ते म्हणाले. आम्हाला नोकरीत घ्या आणि आमच्या संसाराला मदत करा अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. संबंधीत सर्वांकडे निवेदने दिली आहेत मात्र कुणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आता करावे काय असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहीला असून सरकार आम्ही आत्महत्या करावी याची वाट पाहत आहे की काय असा संताप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.