नुकसान झालेल्या शेतकऱयांचा सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
यावषी झालेल्या दमदार पावसामुळे दोन ते तीनवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने आदेश दिला होता. मात्र अजूनही काही शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. तेव्हा योग्य सर्व्हे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
काही भागातील पिकांचा अधिकाऱयांनी सर्व्हे करून अहवाल दिला आहे. मात्र अद्याप काही शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आता खरीप हंगामाच्या सुगीला प्रारंभ होणार आहे. बटाटा, सोयाबिन, भुईमूग, रताळी काढणीला वेग येणार आहे. काही दिवसांत भातकापणीलाही सुरुवात होणार आहे. मात्र काही शेतकऱयांची ही सर्वच पिके वाया गेली आहेत. त्यामुळे रब्बी पेरणीलाही लवकरच सुरुवात होणार आहे. तेव्हा तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक पिके कुजून गेली आहेत. यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत जनावरांना लम्पिस्कीनसारखा आजार झाल्याने काही जनावरे दगावली आहेत तर काही जनावरांना उपचार करण्यासाठी शेतकऱयांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. त्यामुळे शेतकरी हा मोठय़ा अडचणीत आला आहे. तेव्हा तातडीने शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
आता रब्बी पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याच काळात जर नुकसान झालेली रक्कम मिळाली तर फायदा होणार आहे. तेव्हा तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱयांची मागणी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जोरदार पावसामुळे शेतकऱयांची पिके वाया जात आहेत. दुबार पेरणी करावी लागत आहे. तरी देखील सुगीच्यावेळीच पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जात आहे. तेव्हा सरकारने शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मदत केल्यानंतरच शेतकऱयांना आर्थिक मदत केली जाईल, असे राज्य सरकार सांगत आहे. पण या दोघांच्या वादामध्ये शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.