मुंबईवरील 26/11 या हल्ल्यानंतर अमेरिकन एफबीआयने डेव्हीड हेडली आणि तहव्वुर राणा या दहशतवाद्यांना अटक केली. यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने हेडलीची न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चौकशी आणि कबुली जबाब घेतला. त्यानंतर तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले. मात्र राणाच्या प्रत्यार्पणासाठी अद्यापी उदासीनता का दाखविण्यात येत आहे? हा प्रश्न मुंबईकर तसेच समस्त जनतेला पडला आहे.
देशाचे आर्थिक नाक तसेच जगातील मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात 26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी हल्ला करत एकच हाहाकार उडवून दिला होता. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनएसजी) कमांडोनी प्रयत्नांची शिकस्त करीत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करीत अजमल कसाब या दहशतवाद्याला अटक केली. त्यानंतर अजमल कसाबला फासावर चढविण्यात आले. या झाल्या हल्ला करणाऱ्या प्याद्या. मात्र या प्याद्यांना हुकुम देणारे वजीर आणि आका अद्यापही मोकाटच फिरत आहेत. त्यांना अटक कऊन अथवा त्यांचा खात्मा कऊन या हल्यात मारल्या गेलेल्या शहीद अधिकारी आणि सामान्य मुंबईकरांच्या आत्म्याला कधी शांती मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. पाकिस्तानातून आलेल्या या दहशतवाद्यांच्या हल्यात केवळ भारतीय नागरिकच मारला गेला नाही तर इस्त्रायल, अमेरिकासह इतर देशांचे नागरिक देखील मारले गेले होते. यामुळे या देशांनी 26/11 हल्यात भारतीय तपास यंत्रणांना मदत केली होती. त्यानुसार, अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशनने (एफबीआय) डेव्हीड हेडली आणि तहव्वुर राणा या दोन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना शिकागो विमानतळावर अटक केली. यावेळी दोघांनीही मुंबईवर झालेल्या हल्याची जबाबदारी घेतली.
मात्र हे दोन्ही दहशतवादी भारताचे गुन्हेगार असल्याने, त्यांचा ताबा मिळविण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा आणि भारत सरकारने जंग जंग पछाडले. मात्र अमेरिकन सरकारने परवानगी दिली नाही. यादरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालीन सह-पोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने डेव्हीड हेडलीची भारतीय तपास यंत्रणेला चौकशी करण्याची आणि त्याचा न्यायालयात कबुली जबाब नोंदविण्याची परवानगी मिळविण्यासाठी खटाटोप करण्यास सुऊवात केली. अखेर याला यश येऊन, अमेरिकन न्यायालयाने हेडलीची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चौकशी आणि न्यायालयात साक्ष तसेच कबुली जबाब नोंदविण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार, हेडलीचा कबुली जबाब नोंदवित असताना हेडलीने पाकिस्तानपासून ते अमेरिका आणि तहव्वुर राणाबाबत सर्व खुलासे केले. हेडलीची चौकशी अ]िण कबुलीजबाब तर मिळाला मात्र तहव्वुर राणाचे काय? असा प्रश्न समोर असतानाच त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने प्रयत्न करण्यास सुऊवात केली. यावेळी तपास यंत्रणांनी अनेक साक्षी-पुरावे गोळा करीत, ते अमेरिकन न्यायालयाला सादर केले. तसेच तहव्वुर राणा हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची सर्व प्रकारे पोलखोल करेल याबाबत देखील किती महत्त्वाचा आहे? हे अमेरिकन न्यायालयाला पटवून दिले. यामुळे अखेर न्यायालयाने तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली.
तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण म्हणजे राज्य सरकार आणि मुंबई पोलीस तसेच सर्व तपास यंत्रणांचे यश तर आहेच. मात्र मुंबईकरांचा देखील तळतळाट आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबियातील सदस्य गमाविले, त्यांचे तळतळाट नक्कीच तहव्वुर राणाला लागले. प्रत्यार्पणाला मंजुरी तर मिळाली मात्र पुढे काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 18 मे रोजी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असताना देखील उशीर का होत आहे? राज्य सरकार अद्यापही त्याच्या प्रत्यार्पणासाठी युद्धपातळीवर हालचाली का करीत नाही? ज्या अधिकाऱ्यांनी 26/11 सारख्या हल्ल्यांचा तपास केला? ज्या अधिकाऱ्याने डेव्हीड हेडलीसारख्या दहशतवाद्याची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चौकशी आणि न्यायालयात कबुली जबाब घेत मोठा खटाटोप केला. त्या अधिकाऱ्याशी तरी राज्य सरकारने तहव्वुर राणा संदर्भात संपर्क साधला आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तहव्वुर राणा या दहशतवाद्याने त्याच्या साथीदारासह मिळुन 56 तास मायानगरी असलेल्या मुंबईला वेठीस धरले होते. या हल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर,संदीप उन्नीकृष्णन या अधिकाऱ्यांना मरण पत्करावे लागले होते. तर 166 मुंबईकर हकनाक बळी गेले होते.
यामुळे जोपर्यंत या हल्यातील कर्त्याधर्त्याना शिक्षा होत नाही, तोपर्यंत या मृतांच्या आत्म्याना शांती मिळणार नाही की त्यांच्या नातेवाईकांना चैन पडणार नाही. यामुळे तहव्वुर राणाबाबत उदासीनता न बाळगता राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावीत. राज्याचे गृहमंत्री देंवेद्र फडणवीस हे अतिशय हुशार असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी नक्कीच याबाबत काहीतरी योजना आखली असणार. यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुऊ असतील. मात्र तहव्वुर राणाबाबत मुंबईकरच नाही तर संपूर्ण देशातील नागरिकांच्या मनात संताप आहे. यामुळे फडणवीस यांच्या प्रयत्नाने लवकरात लवकर तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण होत त्याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाल्यास फडणवीस हे पुन्हा एकदा जनतेच्या मनातील हिरो होतील. एवढेच नाही तर यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांना 26/11 हल्याचा अभ्यास आहे, तसेच यातील दहशतवाद्यांना ज्यांनी हाताळले आहे? ज्या अधिकाऱ्यांनी या दहशतवाद्यांची चौकशी केली आहे? त्या अधिकाऱ्यांना तहव्वुर राणा संदर्भात संपर्क साधल्यास याचा नक्कीच फायदा राज्य सरकारला होईल. एवढेच नाही तर जनतेच्या मनात राज्य सरकारबाबत त्यातल्या त्यात फडणवीस यांच्याबाबत एक आदर्शयुक्त आणि अभ्यासात्मक इमेज तयार होईल.
तहव्वुर राणाचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा त्याचा प्रमुख हाफीज सईद, लख्वीसारखे त्याचे साथीदार आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पडतील. हा हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना दोन वर्षे प्रयत्न करीत होती. यासाठी त्यांनी डेव्हीड हेडली आणि लोकल स्तरावर मदत करण्यासाठी तहव्वुर राणा आणि त्याच्या
ट्रॅव्हल एजन्सीचा उपयोग कऊन घेतला. तहव्वुर राणा हा मुळत: पाकिस्तानी. मात्र कॅनडात स्थलांतरीत झाल्यावर त्याने येथील नागरिकत्व घेतले. त्यानंतर येथे कंपनी स्थापन करीत त्याची एक शाखा अमेरिकेत उघडली. नेमके याच ठिकाणी त्याचा शाळकरी मित्र डेव्हीड हेडली भेटला. त्यानंतर आयएसआय, हेडली, राणा आणि हाफीज सईद यांची पाकिस्तानात भेट होत 26/11 हल्ल्याचा कट शिजला.
यावेळी राणाने हेडलीला त्याच्या कंपनीच्या कागदपत्रासह मुंबईत एक कार्यालय उघडण्यासाठी पाठविले. पाच वेळा हेडली हा राणाच्या कंपनीच्या कागदपत्रासह मुंबईत येऊन त्याने हल्ला नेमका कुठे-कुठे करायचा? याची रेकी केली आणि तो वास्तवात उतरविला. यामुळे तहव्वुर राणाचा ताबा किती महत्त्वाचा आहे? हे स्पष्ट दिसून येते. यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर हालचाल करणे आवश्यक आहे.
अमोल राऊत