जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
हवामान खात्याने राज्यामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्हय़ालाही यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हय़ामध्ये पावसामुळे 37 घरांची पडझड झाली आहे. खानापूर तालुक्मयातील एक शाळाही कोसळली आहे. येत्या 72 तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, अशी शक्मयता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील धरणांमधून अद्याप तरी पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. कोयना तसेच राजाराम जलाशयामधून पाणी सोडण्यात आले नाही. मात्र महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्मयता आहे. याचबरोबर जिल्हय़ातील नद्याही आता तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र अद्याप तरी पूर कोठेच आला नाही, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
एनडीआरएफ पथक सज्ज
पुरामुळे धोका निर्माण होणाऱया गावांतील नागरिकांना हलविण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. एनडीआरएफ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अतिवृष्टीबरोबरच नदीकाठावरील गावांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. काही गावांना जिल्हाधिकाऱयांनी भेटी दिल्या आहेत. त्याठिकाणी अधिकाऱयांना काही सूचनाही केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
हवामान खात्याने राज्यातील काही जिल्हय़ांना रेड अलर्ट तर काही जिल्हय़ांना यलो अलर्ट जारी केला आहे. बेळगाव जिल्हय़ाला यलो अलर्ट आहे. तर उडुपी, कारवार, मंगळूर, कोडगु, चिक्कमंगळूर, शिमोगा आणि हासन जिल्हय़ांना रेड अलर्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वच जिल्हय़ातील जिल्हाधिकाऱयांनी दक्षता घेतली आहे.
जिल्हाधिकाऱयांकडून सतर्कतेचा इशारा
येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्मयता हवामान खात्याने दिली आहे. दि. 10, 11, 12 आणि 13 जुलै रोजी पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत अधिक पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱयांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.